ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने, जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून अखिल भारतीय हिंदू संग्राम सेना, नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने ऐतिहासिक भुईकोट किल्ला कंधार येथे गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात दि १५ एप्रिल रोजी राबविण्यात आले. या अभियानात तब्बल ५०० संग्राम सैनिकांनी परिसरात किल्ल्यावरील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली तसेच गडाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. “गड-किल्ले हे आपल्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” श्रमदान केले. असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
भुईकोट किल्ला परिसर स्वच्छ केले असून युवकांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि जतनाची भावना अधिक दृढ झाली आहे. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार संघटनेने या भव्य उपक्रमामुळे व्यक्त केला.