कंधार : प्रतिनिधी
“ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे.” हा विचार देणारे साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन समता, स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाचा अखंड प्रेरणास्रोत आहे.
आज, शनिवार दि. १८ जुलै रोजी कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक कैलासभाऊ कांबळे, माजी सभापती पंडितराव देवकांबळे, बाबुराव टोम्पे, उत्तम मळगे, नारायण मोरे,संयुक्त ग्रुप संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती साठेनगरचे अध्यक्ष बालाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव मल्हार नगरचे अध्यक्ष विलास वाघमारे, विश्वंभर वाघमारे, सुनिल कांबळे, विजय गायकवाड, दत्ता धर्मेकर, सूर्यभान वाघमारे, बापूराव भैले, गजानन गोंटे, विजय वाघमारे, अजय वाघमारे, स्वप्नील कांबळे, मोनित गायकवाड, रणधीर कांबळे, श्रीनिवास वाघमारे, साई गंडबे, बबलू गंडबे, सरोज मोरे, निलेश मोरे, उद्धव वाघमारे, दयानंद मळगे, राम कांबळे, माधव रोकडे, संभाजी फुले, श्याम गंडबे, स्वप्नील वाघमारे, बळीराम सूर्यवंशी, मुंजाजी बनसोडे, नागोराव लोंढे तसेच समस्त मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम केवळ अभिवादनाचा नव्हता, तर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना कृतीत उतरविण्याचा संकल्प होता. त्यांच्या समता, शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी.

