१९५८ मध्ये मुंबईत पहिले दलित साहित्य संमेलन झाले.या संमेलनाचे उद्घाटक शाहीर अण्णाभाऊ साठे होते.आपल्या भाषणात अण्णाभाऊंनी महत्त्वाचे विचार मांडले. ते म्हणाले *पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकरी व श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे*. दलित म्हणजे कामगार, कष्टकरी, शोषित, पिडीत ,उपेक्षित,वंचित, सर्वहारा सर्व श्रमिक या अर्थाने तो होता. त्यांनी युगानुयुगाचे समज एका क्षणात नष्ट होत नसतात. म्हणून आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तविक जगाच्या सर्व जुलूमातून मुक्त केले पाहिजे.
हा विचार मांडला होता. त्यांची ही भूमिका दलित साहित्य चळवळीला आणि एकूणच परिवर्तनाच्या चळवळी निर्माण करणाऱ्या लेखक,सामाजिक कार्यकर्ते आणि नेते मंडळींना कायम प्रेरक मार्गदर्शक ठरणारी अशीच आहे.अण्णाभाऊचे लेखन हे जीवनसृष्टी आणि वाड्मयीन दृष्टी व्यक्त करणारे वास्तववादी होते. म्हणूनच अण्णा भाऊंनी म्हटले आहे.
*जग बदल घालून घाव| सांगून गेले मला भीमराव| गुलामगिरीच्या या चिखलात| रुतून बसला का ऐराव|अंग झाडूनी निघ बाहेरी| घे बिनी वरती घाव|*| हा डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्या कवनातून व्यक्त केला. अण्णाभाऊचे हे गीत आजही समाजाला प्रेरणा देणारे, दिशा देणारे आहे. हा संदेश आपल्या हृदयावर कोरला जावा. असा आहे युगानुयुगाचे समज नष्ट होण्यासाठी दलित समाज एकजीव होण्यासाठी त्यांनी दिलेला संदेश आज लाख मोलाचा ठरला आहे.
अण्णा भाऊच्या साहित्य विषयी वि.स. खांडेकरांनी म्हटले होते. नदीचा प्रवाह काय तिच्या काठावरच्या लोकांच्या इच्छेनुरूप वाहतो. पण त्यानं कितीही वेडी वाकडे वळण घेतली तरी त्याच्या भोवतालचा भाग तो पिकवीत जातो. कलावंतांचा तसंच आहे. अण्णाभाऊचे लेखन कार्य हे याच प्रकारचे होते. कार्ल मार्क्स यांच्या तत्त्व विचारांचा प्रभाव व डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव आणि स्वतःची स्वतंत्र प्रतिभा शक्ती या आविषकारा मधून एक वेगळ्याच रसायनाचे साहित्य त्यांनी निर्माण केले. म्हणूनच या शाहिरांचा आज जयजयकार होत आहे.तो आज आणि उद्याही होत राहील. *माझी मैना गावावर राहिली |माझ्या जीवाची होतीया काहीली* || हे गीत गाऊन सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. तसेच ते मुंबईच्या स्वरूपाविषयी लिहितात.
*हे मुंबई बंदर| सगळ्या दुनियेत सुंदर |छानदार हालीच्या वेळी दिवाळी संध्याकाळी| चहु कडून हवा दिसे पिवळी| भारी मजा पिल हौसा जवळी||* अशा पद्धतीचे वर्णन करून आपल्या शाहिरीला धार दिली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात आपला वेळ कधीच वाया घालवला नाही. साहित्य क्षेत्रातील त्यांची उंची अतिशय मोठी आहे. फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉ.बाबासाहेब यांना अर्पण केली आहे. त्या कादंबरीचे २२ भाषेत भाषांतर झाले आहे.३५ कादंबऱ्याचे लेखन त्यांनी आपल्या आयुष्यात केले. वेगवेगळ्या नाटिका, पोवाडे गायले, स्मशानातील सोनं ही त्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची अशी कथा आहे. अण्णाभाऊंनी बेकायदेशीर लोक मंत्री, दे.भ.घोटाळे, दुष्काळात तेरावा, पेंग्याचं लग्न, पुढारी मिळाला, माझी मुंबई ,बिलंदर बुडवे अशी विविध वगनाट्य लिहिले. त्याच्यामधून त्यांनी सवाल-जवाब रंगविले. गरिबी व श्रीमंती यांच्यातील कायमची दरी त्यांनी आपल्या वगनाट्यातून सांगून समाजाला दारिद्र्यातून वर आणण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत लोक हे गोरगरीब ,पीडित ,लोकांना कशा पद्धतीने लुटतात. याची माहिती त्यांनी वगनाट्यातून करून दिली. माझा रशियाचा प्रवास हे . अनुभवाच्या शाळेतून वास्तववादी लेखन केले आहे. संयुक्त महाराष्ट्राला मोठे यश मिळत असताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमीर शेख, शाहीर द.ना.गवाणकर या व्यक्तींनी अतिशय आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यांच्या जोडीला वृत्तपत्रे प्रबोधन, केसरी ,सकाळ ,नवाकाळ, नवयुग प्रभात ,यांनी सुद्धा जनजागृतीचे काम केले.अण्णाभाऊच्या साहित्याची दखल आजतागायत व्यवस्थितपणे घेतली गेली नाही. त्यांच्या वाट्याला नेहमी दुःखच आले आहे. दोन दिवस शाळेत गेल्यानंतर त्यांनी शाळा सोडून दिली आणि समाजाची शाळा चालवली. समाजाला प्रेरणा देण्यासाठी या व्यक्तीने आयुष्यभर आपल्या साहित्यातून परिवर्तन केले. आज समाजा मध्ये अनेक एक गट पडत आहेत .जाती निर्माण केल्या जात आहेत.
प्रत्येक जातीच्या हातात वेगळा झेंडा देऊन समाजामध्ये तंटे निर्माण होत आहेत. त्या काळात शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्व समावेशक असे आपले कार्य केले. म्हणूनच आज आपण स्वतंत्र महाराष्ट्रात राहत आहोत. याची जाणीव आजच्या समाज बांधवांनी घ्यावी.आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या या वाड्मयीन कार्याला मानाचा मुजरा.…