कंधार :(दिगांबर वाघमारे )
दि. 27 एप्रिल – देशभरात “गो सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा तसेच संपूर्ण भारत गोहत्यामुक्त व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी व्यापक मोहीम सुरू आहे. विविध साधू-संतांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम संपूर्ण भारतभर राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कंधार येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार कंधार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावेळी श्री संत नामदेव महाराज संस्थान, उमरज चे मठाधिपती श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत कंधारवासीयांच्या वतीने गोहत्या प्रतिबंधक कायदा अधिक कठोरपणे लागू करावा, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि देशभर गोसंरक्षणासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज यांनी गोसंवर्धन, गोसंरक्षण आणि भारतीय संस्कृतीत गायीचे असलेले महत्त्व यावर मार्गदर्शन केले. गोमाता ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असून तिचे धार्मिक वैज्ञानिक महत्त्व असल्याने गो मातेचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सकल हिंदू समाज बांधवांनी या अभियानाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत एक हजार सह्यांचे निवेदन देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी यावेळी श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज, माजी सभापती बालाजीराव पांडागळे ,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे, भगवान राठोड ,गंगाप्रसाद यन्नावार, उत्तम चव्हाण ,शंकर जाधव ,निरंजन वाघमारे ,अड सागर डोंगरजकर ,किशन कळणे ,केदार मुत्तेपवार,जयराम कांबळे,
हणमंत डुंमने, राम निलावाड ,जगदीश धोंड, सुंदरसिंग जाधव,गजानन तोलडी, बालाजी गुठे,मोतीराम तोरणे,अंकुश चव्हाण, अनेक नागरिक, गो सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

