नांदेड/- अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण हा फॉर्मुला देशव्यापी आहे जो संघाच्या पॉलिसी मेकर्सने तयार केलेला आहे जो संपूर्ण भारत देशामध्ये न्यायालयाच्या माध्यमातून माजी सरन्यायाधीश भुषण गवई साहेब यांच्या माध्यमातून लागू करून घेतला गेला आहे ही बाब फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे …!
मांग समुहानेच हा सगळा खेळ मांडला आहे ही धारणा चुकीची आहे ..!
तेलंगणा -कर्नाटक -आंध्र -हरियाणा -पंजाब या राज्यामध्ये वर्गीकरण लागू झाले मातंग समाज या राज्यामध्ये आरक्षणाचे वर्गीकरण करा अशी मागणी करायला गेला नव्हता..! हा फॉर्मुला सरकारचा आहे आपण सरकारच्या विरोधात भांडले पाहिजे मातंग समाजाला टार्गेट करून आपसात वर्गीकरण करणे थांबवले पाहिजे …!
सरकारने आरक्षणाचे वर्गीकरण करायचे ठरवले आहे आपण आपसात वर्गीकरण का करत आहोत ?
मार्गदात्या महापुरुषांच्या शाब्दिक विटंबना का करत आहोत हे थांबवले पाहिजे ?
सरकारच्या सोबत असलेले बौद्ध – मातंग लीडर यांना प्रश्न का विचारले जात नाहीत ? त्यांना या सागळ्या पॉलिसी माहित आहेत …त्यांना भांडा
नांदेड येथे शहीद पोचीराम कांबळे बचत गटाच्या वतीने फुले -आंबेडकर व्याख्यानमालेच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून अजिंक्य चांदणे यांनी आपले मत मांडले ..!
दि २६-४-२६
पीपल्स कॉलेज नांदेड
(((DPI social media ))

