#आषाढी वारीसाठी मानाची व प्रसिद्ध असलेली कंधारची श्री संत साधु महाराजांची पायी दिंडीचे आज बुधवारी, दि.८ जुलै रोजी कंधार येथून पंढरपूरकडे रवाना झाली असून शहरात ठिकठिकाणी रांगोळी, पताका, खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले. हजारो महिला पुरुष मंडळी या मध्ये सहभागी झाले होते. आज दि.८ जुलै रोजी निघालेल्या दिंडीचा १५ ठिकाणी मुक्काम असणार आहे, अशी माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची पायी दिंडी म्हणून कंधारची संत साधू महाराजांची दिंडी ओळखली जाते. या दिंडीमध्ये वारकरी, पताकाधारी, टाळकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. एकूण १५ दिवसांत दररोज किमान २० ते २५ किमीचा प्रवास करत पायी दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पोहोचते. या दिंडीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. जागो जागी वारकऱ्यांसाठी चहा, पाणी, भोजन, मुक्काम आदी व्यवस्था स्थानिकांकडून करण्यात येते. या दिंडीसोबत चांदीचा रथ आणि चांदीच्या पादुका असतात. यंदा श्री संत साधु महाराज संस्थानचे ८ वे वंशज तथा मठाधिपती एकनाथ महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाखाली व दिंडी चालक हभप ज्ञानेश्वर महाराज कंधारकर यांच्या नेतृत्वाखाली कंधार येथुन श्री संत साधु महाराजांच्या पायी दिंडीचे नवीन स्वरुपात प्रस्थान झाले.
१४ दिवसांचा हा पायी प्रवास पार पाडून दिंडी २२ जुलै रोजी पंढरपूर श्री विठ्ठल-रुखमाईच्या चरणी पोहोचणार आहे.दिंडी मार्ग: कंधार, लोहा, माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरुर (ता.), चापोली, चाकूर, धरणी, भातखेडा, लातूर, साकरा, बोरगाव, मुरुड, ढवळाळा, तडवळ, येडशी, घाटी, जामगाव, बाशी, म्हैसगाव (मळा), कुर्डवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव मार्गे– पंढरपूर असा आहे.
(अधिक माहिती )
प.पु.संतश्रेष्ठ गुरुवर्य श्री संत साधु महाराज मठ संस्थान कंधारची दिंडी व परंपरेचा संक्षिप्त इतिहास. ================================= कंधार कंधार ही नगरी राष्ट्रकुट कालिन राज घराण्याची उपराजधानी म्हणुन प्रसिद्ध असली तरी ही प. पु. संतश्रेष्ठ गुरुवर्य श्री साधु महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणीत झाल्या मुळे कंधारला वेगळी ओळख निर्माण झाली.प.पु.साधु महाराज यांचा जन्म इ.सन. १७०८ ते १८१२ या कालावधीत कानडखेड ता.पुर्णा जि. परभणी येथे पैठणचे संतश्रेष्ठ गुरुवर्य एकनाथ महाराज यांचा दुसरा अवतार समजत. त्यांना प्रत्यक्ष दत्त प्रभुंनी मंत्रदीक्षा दिली. अशी अख्यायिका आहे. साधु महाराज यांचे मुळ नाव हनुमंत रामजीपंत देशपांडे होते. कंधारचा राजा जयसिंह यांनी साधुमहाराजांना कंधारला आणले. त्यांची वृत्ती साधु सारखी होती म्हणुन त्यांना सर्वचजण साधु महाराज नावाने ओळखत. साधुमहाराज म्हणजे पंढरपूरच्या श्री पांडुरंगाचे व त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचे निस्सीम भक्त उपासक होते. पंढरपुरला नित्याने वारकऱ्यांची पायी दिंडीची पध्दत रुढ केली. श्री संत साधुमहाराजांपासून पंढरीच्या पायी वारीची परंपरा मध्यंतरी निझामी राजवटीत कांही प्रमाणात कमी झाली होती. ती परंपरा शंकर महाराज व त्यांचे थोरले बंधू सीताराम महाराज यांनी पुन्हा सुरू केली. मराठवाड्यातील कंधारचे साधुमहाराज हे एक मोठे दत्तोपासक अठराव्या शतकात होऊन गेले. परभणी जिल्ह्यात पूर्णा स्टेशनजवळील कानडखेड या गावी एक अश्वलायन शाखेचा ब्राह्मण राहात असे. त्याचे नाव रामाजीपंत व त्याच्या पत्नीचे नाव रमा असे होते. प्रपंच आणि परमार्थ यांत दोघांची गती चांगली होती. हरिभजनात दोघांना प्रीती होती. पण पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे उभयता कष्टी असत. काही कृपा संपादन करावी म्हणून रामाजीपंत रमाबाईसह माहुरास येण्यास निघाले. मनात दत्ताचे ध्यान सतत होते. तीर्थावर स्नान करून दोघांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. मनोभावे प्रार्थना करून मध्यरात्रीच्या वेळी दत्तात्रेय बटुवेषाने प्रगटले आणि त्यांनी रमाबाईस श्रीफलाचा प्रसाद दिला आणि ‘या प्रसादें होईल सुत । तो माझा परम भक्त ।’ असा आशीर्वाद दिला. भजनमार्ग वाढवील । मुक्तीची गवादी घालील ॥ मुमुक्षु पांथीक येतील । धावुनी तृप्त व्हावया ॥ एकनाथ भक्तजेठी । अवतरेल तुम्हां पोटीं ॥’ असे सांगून दत्तप्रभू गुप्त झाले.या कृपाप्रसादेकरून रमाबाई गर्भवती होऊन तिला यथासमयी पुत्र झाला. त्याचे नाव हनुमंत ठेवण्यात आले. त्या काळास अनुसरून विद्यार्जनास प्रारंभ झाला. घराण्यातील दत्तभक्तीच छंद त्याला लहानपणापासूनच होता. दत्तभेटीसाठी तो उत्सुक बनला.कै हैं संसारबिरडें फिटेल । कैं तो स्वामी मज भेटेल । युगाहुनीया वडील । निमिषोन्निमिष मानीतसे ॥’अशी दत्तभेटीची मनात तळमळ असताना तो आपल्या आईवडिलांची सेवा मात्र चुकत नसे. त्याच्या या सेवारत वृत्तीने दत्तप्रभू संतुष्ट झाले आणि यतिवेष धारण करून ते त्याच्या अंगणी एकदा आले. हनुमंताची विचारपूस केली आणि त्याला गोदातटाकी सिद्धेश्वर लिंगापाशी येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हनुमंताची व दत्तात्रेयांची भेट झाली. हनुमंताने दत्तप्रभूना साष्टांग नमस्कार करून विनविले,आतां योगीवर्ये कृपावंते अनसुयात्मजे माझी माते। भावें शरण आलों तूंते। सनाथ पंथें मिरवी का?’ यतिरूपधारी दत्तात्रेयांनी त्याला कृपाशीर्वाद दिला आणि स्वरूप प्रकट केले.या दत्तभेटीने हनुमंताचे जीवित कृतार्थ होऊन गेले.यानंतर हनुमंतास माहुरास येण्याची इच्छा झाली. श्रीदत्तचरणांशी एकांत करून ‘जैसी दत्तमूर्ती पाहिली । तैसीच हृदयी आठविली.’ येथे तप करीत असतानाच शेषफणीच्या सावलीत ध्यानस्थ बसलेली याची मूर्ती जोतसिंह नृपनाथाने पाहून त्याला आपल्या नगरीत नेले. पांचाळपुराहून हनुमंत तथा साधुराज पंढरपुरास गेले. काशी, प्रयाग, गया, नागपूर, पंढरी इत्यादी क्षेत्रांच्या त्यांनी यात्रा केल्या. नामस्मरण, हरिकीर्तन, भजनपूजन यांत रंगून गेलेल्या साधुमहाराजांनी संताचार्यासारखे शिष्य तयार केले. नामस्मरणाचा सुकाळ केला. अनेक जीवांचा उद्धार करून साधुमहाराजांनी दत्त व विठ्ठल यांच्या ऐक्यावर आधारलेला आपला एक विशिष्ट संप्रदाय उभा केला. भास्कर – रूक्मांगद – यशवंत हनुमंत -धुंडिराज – सीताराम – शंकरमहाराज आणि श्रीसंताचार्य बापूमहाराज -बाबूमहाराज अशी विचारसरणीची परंपरा साधुमहाराजांची आहे. साधुमहाराजांना नाथांचा अवतार मानतात. त्यांना दत्तादर्शनाची ओढ नेहमीच असे. असेच एकदा माहुरास जाण्यास ते निघाले. पत्नीला बरोबर घ्यावे असे त्यांना वाटले. पणसाधुमहाराज शिष्यांना बरोबर घेऊन माहुरास निघाले. अरुणावतीस म्हणजे वाढवण्यास येऊन त्यांनी हरिहरात्मक परमेश्वराचे दर्शन घेतले. नंतर ते उंबरखेड म्हणजे उमरखेडास आले. तेथे त्यांना बरे वाटेनासे द्याले संताचार्यास ते म्हणाले गर्भवती कन्या ठवुना घरा । आपण कस जाय माहुरा। तरी प्राणेश्वरा अवधारीं । जावें तुम्हांसी न वर्जी’ असे तिने सांगितले.साधुमहाराज शिष्यांना बरोबर घेऊन माहुरास निघाले. अरुणावतीस म्हणजे वाढवण्यास येऊन त्यांनी हरिहरात्मक परमेश्वराचे दर्शन घेतले. नंतर ते उंबरखेड म्हणजे उमरखेडास आले. तेथे त्यांना बरे वाटेनासे झाले. संताचार्यास ते म्हणाले,’आम्हांस दर्शन दत्तात्रेय। देईल ऐसें दिसेना ॥’ना पंढरी ना माहुर अशी स्थिती असताना त्यांना तेथील आईनाथांनी दृष्टांत दिला की,’माझिया वामभागीं। निश्चित । सखया समाधिस्थ पैं व्हावें ॥’. साधुराजांनी दत्तप्रभूची प्रार्थना केली. पांडुरंगाला आळविले. वत्सासाठी धेनू धावत येते तसे साधुमहाराजांसाठी दत्त व पांडुरंग धावत आले. श्रीदत्तात्रेयांच्या सांगण्यावरून त्यांनी संन्यास घेतला आणि ‘चैत्र शुद्ध एकादशीस, शके सतराशी चौतीस’ या मुहूर्तावर साधुमहाराजांनी समाधी घेतली.दत्त व पांडुरंग यांची ऐक्यभावाने उपासना करणाऱ्या साधुमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र दासमारुतींनी लिहिलेले प्रसिद्ध आहे. गुरुपरंपरा-भास्कर-रुखमांगद-यशवंत-हनुमंत-धुंडिराज-सीताराम-शंकर महाराज-संताचार्य बापू महाराज-बाबू महाराज साधुमहाराज कंधारकार १९५४ साली कंधारहून पंढरपूरला दिंडी सोहळ्याने पायी वारी करण्याची परंपरा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली. या पायी वारीच्या टाळ-मृदंगाच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाच्या वाटचालीत गावोगावी जाऊन कीर्तन- प्रवचने या माध्यमांतून संतांच्या वाणींचे लोकमानसावर दृढ संस्कार होत असत.त्यांच्या सात पिढ्यावर भगवान श्री दत्तात्रय महाराजांचा वरदहस्त होता. प.पू साधु महाराज यांची संजीवन समाधी उमरखेड जि.यवतमाळ येथे असून कंधार नगरीत वंदनीय साधुमहाराज यांची वस्त्रसमाधी आहे. त्यांचे उत्तराधिकारी प.पु.श्री भास्कर महाराज, प.पु.श्री ऋक्मानंद महाराज, प.पु.श्री यशवंत महाराज, प.पु.श्री हनुमंत महाराज, प.पु.श्री धुंडीराज महाराज, प.पु.श्री सिताराम महाराज, यांच्या समाध्या मठ संस्थान मध्ये आहेत.प.पु.श्री साधु महाराज कंधार यांनी किल्ल्यात प्रधान म्हणून ही कांही काळ काम केले. साधु महाराज यांना दृष्टांत देवून महाजन यांच्या शेतातील शिवेवरील श्री गणपती प्रगट झाले. अशी अख्यायिका सर्वपरिचित आहे. संस्थानची आठवी पिढी चालू असून विद्यमान मठाधिश, संस्थानाधिपती गुरुवर्य ह.भ.प.एकनाथ महाराज आहेत. संस्थानचा त्यांच्या अधिपत्याखाली चालतो.ह.भ.प.श्री साधुमहाराज संस्थानचे दोन मठ श्री क्षेत्र पंढरपुरात आहेत. साधु महाराजांचे सातव्या पिढीचे वंशज यांच्या कुळात शंकर महाराज यांचा जन्म झाला. संत एकनाथ महाराजांनंतर लोकजागृतीचे कार्य करणारी जी संतपरंपरा निर्माण झाली, त्यात कंधारचे प्रसिद्ध संत साधुमहाराज हे होते. साधुमहाराजांपासून सातव्या पिढीचे शंकर महाराज यांनी भागवतधर्मपरंपरेला उजाळा दिला.शंकर धुंडिराज साधू, उपाख्य शंकर महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य ३, शके १८४४ रोजी कंधार (जि. नांदेड) येथे धुंडिराज महाराज व मथुराबाई या धर्मशील दाम्पत्याच्या पोटी झाला. महाराजांचे शालेय शिक्षण अल्पच होते. संस्कृत भाषा, व्याकरण, साहित्य, वेद- वेदान्ताचे त्यांनी सखोल अध्ययन केले. वेदशास्त्रसम्पन्न गोविंदशास्त्री देवणीकर यांच्याकडे महाराजांनी संस्कृतचे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर नांदेड येथे महामहोपाध्याय यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी ‘काव्यतीर्थ’ ही पदवी संपादन केली. संस्कृतच्या अध्ययनानंतर महाराज चतुर्मासात पंढरपूर येथे राहून ते माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर नित्य प्रवचन, अनेक वेदांत ग्रंथराजावर निरुपण करीत. गुरुवर्य ह.भ.प.शंकर महाराज कंधारकर यांनी स्वतःच्या विदवत्तेच्या बळावर ग्रंथ संपदा लेखन करुन जगभर किर्तीध्वजा फडकवून वारकरी संप्रदायाच्या आभ्यासू जनांनी त्यांची ग्रंथ संपदेचा आभ्यासासाठी वापर केला. कंधार येथे त्यांचे स्मारक मंदिर आहे.कंधार येथील साधुमहाराज यांची ही पारंपारिक दिंडी ह.भ.प.गुरुवर्य एकनाथ गुरु साधु महाराज यांच्या पुढाकाने दिंडी कंधारहून प्रस्तान करीत आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी| आणिक न करी तीर्थव्रत|| मराठवाड्याच्या संत परंपरेतील अत्यंत श्रद्धास्थान मानला जाणारा आणि मागील ३०० वर्षापासून श्री संत साधू महाराज पायी वारी चालू आहे आणि वै. ह.भ.प. सिताराम उर्फ बाबू महाराज कंधारकर आणि वै. ह.भ.प. शंकर महाराज कंधारकर यांनी वारी चे रुपांतर दिंडी मध्ये केले आणि ती दिंडी ७० वर्षांपासून अखंडितपणे चालू असलेला श्री संत साधु महाराज संस्थानचा पायी दिंडी सोहळा यंदाही भक्तिभावाने रंगणार आहे. हा भव्य सोहळा श्री संत साधू महाराज संस्थान कंधार – उमरखेड – पंढरपूर दरम्यान नियोजित असून,दि.०८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता कंधार येथील श्री संत साधू महाराज संस्थानातून प्रस्थान होणार आहे.या पवित्र सोहळ्याचे मार्गदर्शन ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज साधु कंधारकर आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज साधु कंधारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पायी वारीत संतांचे नामस्मरण, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन यामुळे वातावरण भक्तीमय होणार आहे. यंदाच्या दिंडीची विशेष आकर्षण म्हणजे गेल्या वर्षी नवीन चांदीचा रथ आणि चांदीची पालखी, जी श्री साधू महाराज यांच्या पादुका भक्तांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. १४ दिवसांचा हा पायी प्रवास पार पाडून दिंडी २२ जुलै रोजी पंढरपूर श्री विठ्ठल-रुखमाईच्या चरणी पोहोचणार आहे. दिंडी मार्ग: कंधार, लोहा, माळाकोळी, माळेगाव, सांगवी, अहमदपूर, शिरुर (ता.), चापोली, चाकूर, धरणी, भातखेडा, लातूर, साकरा, बोरगाव, मुरुड, ढवळाळा, तडवळ, येडशी, घाटी, जामगाव, बाशी, म्हैसगाव (मळा), कुर्डवाडी, कुर्मदास, आरण, आष्टी, आढीव मार्गे– पंढरपूर असा आहे. या पायी वारीमध्ये महाराष्ट्रभरातील शिष्यगण आणि हजारो भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होतात. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात, “गगन सदन तेजोमय, चंद्रभागा स्नान करावे” अशा अभंगांच्या गजरात ही दिंडी विठ्ठलभक्तीने उजळून निघणार आहे. माझ्या जीवाची आवडी, पंढरपुरी नेईल गुढी । टाळ मृदंगाचा गजर, हरिपाठ होई पदी ॥ साधु महाराजांच्या पादुका दर्शनासाठी व अभिषेकासाठी इच्छुक भाविकांनी खालील संयोजकांशी संपर्क साधावा: संस्थानचे आभ्यासक *मंदार एकनाथ महाराज कंधारकर हे सध्या आपल्या आभ्यासू वाणीतून मांडतात. श्री दत्तात्रय माने – ९८२३१७७०९,श्री संदीप आलेगांवकर – ९४०३३८८९८७,श्री एकनाथ गोटमवाड – ८४२१२००२३०,श्री अरुण येईलवाड ९१४६१३०६१९ श्री श्रीराम येईलवाड – ९४२३०६५६८१७,श्री श्रीराम करेवाड – ८३२९२६९४३२,श्री गंगाधर कवडे – ९५६१८१६७९० हा पायी दिंडी सोहळा म्हणजे श्रद्धेचा महासागर असून, भक्ती, सेवाभाव, आणि संत परंपरेचे जतन करणारा मराठवाड्याचा एक अनमोल सांस्कृतिचा अनमोल ठेवा.
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात गरुड खांबास चांदीचा मुलामा (पत्रा) साधु महाराज संस्थानच्या प्रयत्नांने व कंधार येथील मनोहराव महाजन दानशूर व्यापारी शिष्याच्या अर्थ साह्याने मढविण्यात आला.साधु महाराजांचे संपुर्ण जीवन चरित्र “साधुसुधा” या पहावयास मिळेल. साधुमहाराज यांचा शिष्य परिवार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत सर्वत्र आहे. ही माहिती साधुमहाराजांचा सातवा वंशज ह.भ.प.श्री ओंकारनाथ (तात्या) महाराज कंधारकर यांनी दिली आहे.श्री संत साधु महाराज संस्थान कंधार ही या संस्थानचे सदभक्त शिषोत्तम स्व. शिवाजीराव केंद्रे यांचे कडून संकलन सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता कंधार.यांची लेखातून सेवा साधुमहाराज मठ संस्थानच्या चरणी.