
कंधार : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील फुलवळ तालुका कंधार येथील पथकर (टोल) नाका बंद करून टोलवसुली थांबवावी,तसेच बहाद्दरपुरा येथील पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली स्थगित करावी,अशी मागणी कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात कंधार तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने पथकर नाका फुलवळ येथे आंदोलन,टोल बंद करुन निदर्शने करण्यात आले,कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय ईश्वरराव भोसीकर यांनी उपविभागीय अधिकारी कंधार यांचे प्रतिनिधी व व्यवस्थापक, पथकर नाका फुलवळ यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात बहाद्दरपुरा येथील पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून अद्यापही काम सुरू झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाका सुरू करण्यात आला आहे.मात्र महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बहाद्दरपुरा येथील पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे वाहनचालकांना सुमारे १२ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
बहाद्दरपुरा पुलाचे काम पूर्ण न करता टोलवसुली सुरू ठेवणे अन्यायकारक असून जनतेची आर्थिक लूट थांबवावी,अशी भूमिका काँग्रेसने निवेदनातून मांडली आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत फुलवळ येथील पथकर नाका बंद करून टोलवसुली थांबवावी,अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास काँग्रेसच्या वतीने टोल नाका बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहेयाप्रसंगी पथकर नाकाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या प्रवाशांचे गैरसोय होऊ नये म्हणून पथकर नाका व रस्ता खुला करण्यात आला,
यावेळी कंधार तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर,कंधार शहराध्यक्ष सय्यद सलीम सय्यद रहीम,जिल्हा उपाध्यक्ष विश्वंभर पाटील मसलगेकर,जिल्हा सरचिटणीस बसवेश्वर मंगनाळे,माधवराव गित्ते,माजी पं.स.सदस्य रामभाऊ देवकांबळे,तालुका सचिव सुरेश कल्लाळीकर,नगरसेवक प्रति सचिन बसवंते,युवक काँग्रेस जिल्हा महासचिव शिवम पाटील कुरुळेकर, सरपंच शंकर डिगोळे,नवनाथ बनसोडे,विधानसभा उपाध्यक्ष अविनाश आंबटवाड आलेगावकर,प्रभाकर व्यवहारे,मोहन पाटील वडजे,मनोहर पाटील चांडोळकर,शिवा पाटील बोरगावे,अशोक कदम शेकापुरकर विवेक चिवडे संदीप कल्याणकस्तुरे मुन्ना बसवंते,पवन पटणे,बालाजी दासरे,हरिदास बसवंते,मारोती गव्हाणे,राहुल पाटील पेठकर,रोहित खरात,आदींसह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





