संत तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले!

नांदेड; प्रतिनिधी

बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले.

वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.  

डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. ते आमचे मार्गदर्शक होते व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांच्या दर्शनानंतर नेहमी एका वेगळ्याच समाधानाची अनुभूति होत असे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

********

काल रात्री बंजारा समाजाचे धर्मगुरू परमपूज्य बालब्रह्मचारी संत तपस्वी श्री डॉक्टर रामराव महाराज संस्थान पोहरादेवी यांचे 84 व्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले बापूच्या निधनाने एका प्रदीर्घ कालखंडाला पूर्णविराम मिळाला असून बंजारा समाजाची कधीही भरून न निघणारी प्रचंड मोठी हानी झाली आहे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम बंजारा समाज हा दुखी आणि पोरका झाला आहे बंजारा समाजामध्ये डॉक्टर रामराव बापू महाराज यांचे योगदान फार मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे कार्य व्यसनमुक्ती. हुंडाबळी. शैक्षणिक प्रसार. महिलेवरचे अत्याचार यावर समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम बापू यांने केले आहे.

त्यामुळे आज देशभरातील डॉक्टर रामराव बापू यांचे भक्तगण आवर खूप मोठी शोककळा पसरली असून आज तमाम या भारत देशातील बंजारा समाजावर समाजाची कधीही न भरून निघणारी पोकळी आज निर्माण झाली आहे बापूच्या निधनाने निधनाबद्दल मी नांदेड जिल्हा समाजकल्याण सभापती अँड रामराव नाईक मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो,

शोकाकुल
अँड. रामराव नाईक
सभापती -जिल्हा परिषद समाजकल्याण नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *