राजकीय शहाणपणा आल्याशिवाय ओबीसींचा उद्धार नाही !

नागपूर पदवीधर मतदार संघात आजवरचा इतिहास बदलला. संदीप जोशी यांचा पराभव झाला. भाजपाचा बालेकिल्ला पहिल्यांदा हादरला ! पण त्यामुळे ओबीसींनी हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण जोशींचा पराभव म्हणजे तुमचा विजय नव्हे !

तो काँग्रेसच्या वंजारी यांचा विजय आहे. तो ओबीसींचा विजय मुळीच नव्हे..! उगाच भ्रमात राहू नका ! तुमचे बावनकुळे, तुमचे कुंभारे, तुमचे दटके, तुमचे खोपडे.. हे सारे लोक तर जोशींचे स्टार प्रचारक होते. अजूनही ते त्यांच्याच दरबारात मुजरा करतात, हे लक्षात घ्या. ह्या लोकांना मतदान करणारे आणि जिंकल्यावर त्यांच्या गळ्यात ऐटीत हार घालणारे देखील ओबिसीच आहेत !

जोशी यांच्या हरण्याचा आनंद आहे..ओके ! पण त्याचवेळी बावनकुळे जोशींचे स्टार प्रचारक होते, याची मात्र आपल्याला लाज वाटत नाही ! ज्या क्षणी तुम्हाला त्याची लाज वाटायला लागेल, त्या क्षणी तुम्ही मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे, असं समजा..! तोवर तुमच्या कुठल्याही लढाईला फारसा अर्थ नाही !

बावनकुळेही तुमचे नाहीत, तसेच वंजारीही तुमचे नाहीत, कारण दोघांचेही पक्ष ओबीसी विरोधी आहेत ! फार काय आपले प्रधानमंत्री मोदी तर मारे स्वतःला ओबीसी म्हणवून घेतात. पण काय फायदा ? मग ओबीसीची जनगणना का करत नाहीत ? ओबीसी – बहुजनांच्या हिताचे सर्वात मोठे मारेकरी तर स्वतः मोदीच आहेत..!

तात्पर्य, माणसाची जात महत्वाची नाही, त्याची नियत महत्वाची आहे ! याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी.. भेटू या..

उद्यारविवारदिनांक ६ डिसेंबर दुपारी २ वाजता.. #फेसबुक_लाईव्ह

माझ्या #Dnyanesh_Wakudkar या फेसबुक अकाऊंट वर..

माझे अकाऊंट फॉलो करण्यासाठी / मित्र होण्यासाठी या लिंक वर जा..

https://www.facebook.com/dnyanesh.wakudkar1

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर पार्टी
•••
संपर्क –

लोकजागर_पार्टी

• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *