कंधार तालुक्यातील हारबळ ग्रामपंचायत बिनविरोध ; सरपंच म्हणून यमुनाबाई टाले यांची केली निवड

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील हारबळ (प. क.) येथील ग्राम पंचायत आज दि.२७ डिसेंबर रोजी बिनविरोध निवड झाली आहे.सरपंचपदी यमुनाबाई ज्ञानोबा टाले, उपसरपंचपदी शिवलिला राहुल वाघमारे यांची निवड गावकऱ्यांनी केली आहे.

याप्रसंगी हारबळ गावातील सर्व नागरीकांनी एकमताने सात सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे.

या सदस्यांतून सरपंचपदी यमुनाबाई ज्ञानोबा टाले, उपसरपंचपदी शिवलिला राहुल वाघमारे, शिवाजी नरसिंगा भुरे, प्रदीप पंढरी सोनकांबळे, बालाजी सटवा गंडबे, यशवंत मारोती कागणे, जयश्री रामेश्वर श्रीरामे
यांची निवड करण्यात आली.

गावातील तीन पॅनल प्रमुख त्यात संजय सोनकांबळे, जयराम टाले, बालाजी टाले यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *