मुंबई
#मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या #रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होते.यावेळी उपस्थित महिला-भगिनींनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना राखी बांधली. महिलांच्या सामाजिक व आर्थिक रक्षणासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रक्षाबधंनाच्या शुभेच्छांसह दिली.
#महिलासक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा कणा असतो. समाजातील महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच राष्ट्राच्या विकासाला गती येते. महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे सांगून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

