
कंधार ; (प्रतिनिधी )
रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शताब्दी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी विद्यार्थीनी माहीन शेख व योगेश्वरी टेंभुर्णेवार यांनी प्रवचनातुन संत ज्ञानेश्वर महाराज यांचे कार्य व ज्ञानेश्वरी , पसायदान बाबत विवेचन केले.
महाराष्ट्र शासनाने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती महोत्सवानिमित्त शाळेत पसायदान वाचन व विविध कार्यक्रमाच्या आयोजनाची सुचना केली आहे त्यानुसार रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थीनी माहीन शेख व योगेश्वरी टेंभुर्णेवार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनकार्य तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथ व पसायदान याबाबत अभंग गात विवेचन केले. यावेळी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.गंगाप्रसाद यन्नावार यांच्यावतीने विद्यार्थ्यांना टिफीन डबे व फळे वाटप करण्यात आले. दि १९ रोजी रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्त शताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिव गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव गंगाप्रसाद यन्नावार, मुख्याध्यापक सुभाष मुंडे, सहशिक्षक श्रीमती शेख वाय आय, श्रीमती मंजुषा यन्नावार, श्री रोहिदास सुर्यवंशी, श्री एकनाथ तिडके, श्री राजीव होंडाळे, श्री तारकेश तपासे, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.






