5 में रोजी लेंडी धरणाची कायद्याच्या विरोधात गळभरणी झाली. पाच मे रोजी जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी पाटील, मुख्य अभियंता दाभाडे साहेब कार्यकारी अभियंता तिडके साहेब तहसीलदार पाटील साहेब आणी लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत लेंडी धरणाची नियमबाह्य गळभरणी झाली. लेंडी संघ समितीचे अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर यांनी संघर्ष समिती च्या वतीने गळभरणीच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकला. गुणभरणीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या पूर्ण टीम सोबत आम्हा संघर्ष समितीच्या लोकांना धरणाच्या गेट वरती येऊन भेट घेतली आणि आमचे समजूत काढायला लागले. त्यांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी गळभरणी करू दिलं तर सहानुग्रा अनुदान वाटप करा अन्यथा करू नका असं स्पष्ट आदेश काढले आहेत असे आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं तेंव्हा संघर्ष समितीचे अध्यक्षाने जिल्हाधिकारी साहेबांना म्हणाले की काही हरकत नाही साहेब आमचे पॅकेज राहू द्या पहिले धरणग्रस्तांच्या इतर समस्या सोडवा आणि विशेष म्हणजे इ.स. 2006 च्या कायद्याप्रमाणे बारा गावचं 18 नागरी सुविधा सह सुसज्ज पुनर्वसन झाल्याशिवाय धरण कोंडता येत नाही तरी पण या निर्गठ शासनाने कायदा मोडून दादागिरीने 500 पोलीस लावून धरण कोंडले.
संघर्ष समितीने खूप विरोध केला पण प्रशासनाने काही पण ऐकून घेतलं नाही आणी आम्हा समितीच्या लोकांना गोड बोलू लागले की आम्ही तुच्या समस्या दोन कॅम्प लावू एक महिन्याच्या आत तुमच्या बरा गावच्या लोकांचे सहानुभ्र अनुदानाच्या नोटिसा वाटप करू. यावर्षी गळभरणी फक्त निमताला करू दहा ते पंधरा टक्केच पाणी कोंडू कुण्याही गावला पाणी लागू देणार नाही तुम्हाला घर बांधण्यासाठी वेळ देऊ अशी लाडीगोडी लावून या निर्दयी लोकांनी कायद्याच्या विरोधात धरण कोंडल आणी सात ते आठ (7-8 ) निष्पाप लोकांचा बळी घेतला आणि 60 -70 मुक्या जनावरांचा पाप घेतला. बांधवानो आणखीन एक महत्त्वाचं सांगणं एखादं धरण करायचं असेल तर धरणाचं बांधकाम करायचं काम इरिगेशन खात्याचं असतं आणि धरण पूर्ण झाल्यानंतर पाणी आडवायचं परमिशन जिल्हाधिकारी साहेबांना द्यायचा अधिकार आहे. सुप्रीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः धरणातील बाधित गावात जाऊन तिथले पुनर्वसन पूर्ण 18 नागरी सुविधा असे झालेत का जुन्या गावातील एक एक कुटुंब नवीन गावात शिफ्ट झाले का याची शहानिशा करूनच गळभरणीचे आदेश जिल्हाधिकारी साहेब देऊ शकतात. दुर्दैवाने जिल्हाधिकारी कर्डिले साहेबांनी पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन अपूर्ण असताना लेंडी चे कार्यकारी अभियंता यांच्या खोट्या माहितीच्या आधारे कुठलीही शहानिशा नकरता गळ भरण्याचे आदेश दिले आणि आज होत्याचं नव्हतं झालं 🙏.
अरुण पाटील अतनुरे
7972867976
ईटग्याळ (प मु) ता मुखेड जिल्हा नांदेड.


