धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
प्रत्येक बालक आणि समाजही बालहक्कांनी समृद्ध व्हावा. असे स्पष्ट प्रतिपादन संगोपन या मासिकाचे संपादक आणि सुप्रसिद्ध बाल हक्क कार्यकर्ते प्रा डॉ अतुल देसाई, कोल्हापूर यांनी केले.
ते येथील कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, समाजशास्त्र विभाग आणि रेणुकाई शिक्षण संस्थेचे रेणुका कॉलेज ऑफ एज्युकेशन रेणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” Child Education and Child Rights ” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणुकाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सौ मीनल शिवराज मोटेगावकर होत्या. प्राचार्य डॉ कैलास मोटे आणि प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी वेबीनारचे उद्घघाटन केले.श्री देसाई यांनी वेबीनारच्या सुरुवातीलाच बाल शिक्षण आणि बाल हक्क हा विषय संवेदनशीलतेने समाजापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले.
पुढे जाऊन आपल्या व्याख्यानात त्यांनी स्थलांतरामुळे होणारे बालकावरील परिणाम, सेक्स अॅबूज सेक्स अऍसल्ट, आर्टिकल ४५ , अन्याय – अत्याचाराचे होणारे शरीरापेक्षा मनावरील आघात,मानसिक ताणतणाव, १९८६ चा बालकामगार कायदा नियम आणि अधिनियम, बालकांच्या आत्महत्येचे कारणे सांगून एखादी संस्था कुटुंबाला पर्याय ठरू शकत नाही असेही सांगितले. बाल शिक्षण, बाल सुरक्षेसाठी उपाय उल्लेखिले .बाल शिक्षणासाठी कुटुंबाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा असेही सांगितले. मतिमंद आणि गतिमंद यातील फरक सांगून बालक आणि समाज बाल हक्काने समृद्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा लहाने सरानी केले तर वेबिनार चे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ पांडुरंग मामडगे यांनी तर आभार प्रा भगवान आमलापुरे यांनी मानले.

