बंजारा समाजातील १०० ‘नायक’ घडवणार!
शांताई प्रतिष्ठान व राठोड एमपीएससी अकॅडमीचा शिक्षणाचा नवा ‘नांदेड पॅटर्न’
संचालक अविनाश राठोड यांचा पुढाकारनांदेड: (दादाराव आगलावे)
शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगून, शांताई प्रतिष्ठान व राठोड एमपीएससी अकॅडमीने ‘नायक काशिनाथ मोफत स्कॉलरशिप’ योजनेद्वारे एक नवा इतिहास रचला आहे, गोर-गरीब तांड्या वस्तीतील मुले लाल दिव्याच्या गाडीत बसावीत, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन राठोड एमपीएससी अकॅडमीचे
संचालक अविनाश राठोड यांनी केले.विद्यार्थी हेच दैवत मानत गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यानंनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सदरील एमपीएससी अकॅडमी चालवतात. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेनंतर आता निवडक विद्यार्थ्यांचा प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रवास सुरू झाला असून, पुढील काळात दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण मानस प्रा. अविनाश राठोड सर यांनी व्यक्त केला.
यंदा २० विद्यार्थ्यांची निवड; ४ जणांना संपूर्ण दत्तक पहिल्याच वर्षी या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून गुणवत्तेच्या जोरावर १० मुले आणि १० मुलींची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या २ मुले व २ मुलींना संस्थेने दत्तक घेतले असून, त्यांच्या शिक्षणापासून ते नोकरी लागेपर्यंतचा संपूर्ण खर्च संस्था उचलणार आहे. हा उपक्रम केवळ यंदापुरता मर्यादित नसून, भविष्यात सर्व समाजातील गरीब व होतकरू अशा शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्याचे ध्येय प्रा. अविनाश राठोड यांनी ठेवले आहे. समाजातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘मिशन १००’ हे अत्यंत प्रभावी ठरणार आहे. सामाजिक क्रांतीचे पाऊल अनेकदा बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे बंजारा समाजातील ग्रामीण भागातील मुले मागे पडतात. अशा मुलांच्या बुद्धीला यशाचे पंख लावण्यासाठी प्रा. अविनाश राठोड यांनी स्वखर्चातून आणि शांताई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून प्रा.अविनाश राठोड यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

