भारतीय शिक्षण पद्धती परीक्षेत मिळणाऱ्या गुणांना महत्व देते.येथे गुणवाना पेक्षा चांगले गुण घेणाऱ्याचे गुणगाण होत.कमी गुण घेणाऱ्याला समाजातील महाभाग टोमणे मारत आसतात. येथील पालकही आपल्या पाल्याची तुलना इतरांच्या पाल्या बरोबर करत असतात.चांगले गुण घेणारे शहाणे हुशार असततात व कमी गुण घेणारे निर्बुद्ध असतात असे काही नाही. गुण कमी जास्त मिळवण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत असू शकतात .
येवढं सांगयचं कारण म्हणजे नुकताच दहाविचा निकाल लागलेला आहे.बहुधा सर्व विद्यार्थ्यांत,घरात,मित्रमंडळीत आनंदाचे वातावरण असताना ऊदगीर येथे बंजारा समाजातील एका मुलीने दहावी बोर्ड परीक्षेत गुण कमी पडले म्हणून आत्महत्या करून घेतली ही घटना मनाला हेलाऊन टाकणारी आहे.मनाला सुन्न करणारी ही घटना आहे.बागेचा माळी उमलत्या कळ्यांना जपतो.कळी मध्येच कोमेजून जावू नये म्हणून वेळेवर पाणी देतो.अशीच काळजी पालक पाल्याची घेत असतो.पण कधी कधी कुटुंबातील वरिष्ठ मंडळी कूटुम्बातील नवीन उमलणाऱ्या फुला कडे दुर्लक्ष करतात.खर तर हे संयुक्त कुटूंब आहे.या कुटुंबात पाच-सहा भाऊ एकत्र राहतात.काही भावाचे मुले डॉक्टर आहेत. तर काही उच्चशिक्षण घेऊन आय ए एस,आय पी एस ची तयारी करताना दिसतात.एकत्र कुटुम्ब पद्धती म्हणजे खरं घर येथे माया असते.येथे प्रेम असते.एकमेकांची काळजी येथे घेतली जाते. एकाच चुलीवर शिजवलेले जेवण येथे असते. आजकालच्या घरात घरपण राहिलेलं नाही. आजचं आपलं घर म्हणजे वेगवेगळ्या खोल्या. भिंतीनी बंदिस्त झालेल्या.घरातील मंडळी एकमेकांच तोंडही पाहात नाहीत.एकमेकांना बोलत नाहीत.फोन टिव्ही मध्येच गुंग;पण येथे असे नव्हते.एकत्र कटुम्ब पद्धती आशा सुशिक्षित एकत्र कुटुंबातील मुलाचे मनोबल तुटत असेल तर विभक्त कुटुंबात रहाणारे पालकांनी वेळीच जागृत व्हायला पाहिजे.
अधुनिक पिढी मनाने येवढी कमजोर का बनत आहे ? मुलांनी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या करणे योग्य नाही.मुलांनो नेहमी लक्षात ठेवा गुण हे आयुष्याचा फक्त एक छोटा भाग आहे रे बाबानो.जीवनात परीक्षेत मिळालेले गुण तुमची किंमत,क्षमता किंवा भविष्यातील यश ठरवत नाहीत.समाजातील देशातील महान होवून गेलेल्या व्यक्तीला वाचा. तुम्हाला कळेल समाजात अनेक लोक होऊन गेले की ते शालेय परीक्षेत नापास झाले पण जीवनाच्या परीक्षेत यशस्वी ठरून महान बनले आहेत.अनेक व्यक्तींना एका परीक्षेत अपयश आले तरी त्यांनी पुढे चांगले आयुष्य घडवले आहे. त्यांनी कधीच आत्महत्येचा विचार मनात आणला नसेल.
परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे आयुष्य संपलं असं तुम्ही का समजता.पाल्य आणि पालकांनी लक्षात ठेवावयास पाहिजे की कमी गुण मिळण्यात अनेक कारणे अनेक घटक जबाबदार असू शकतात.थोडक्यात म्हणजे परीक्षेचा येणारा ताण,आरोग्य, अभ्यासाची पद्धत,भीती,परिस्थिती या गोष्टीचा गुण मिळविण्यात परिणाम होतो.पण यावर उपाय नाही का? यावर उपाय करता येतात.यावर औषध आहे हे विसरू नका.बाळांनो तुमच्या चुका तुम्ही समजून घ्या.त्या चूका समजून पुन्हा तयारी करता येते.यासाठी मदत करायला तुम्हाला तुमचे शिक्षक,मित्र तयार आहेत किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाशी बोलून अभ्यासाची नवीन पद्धत शोधू शकता,नवीन अभ्यास पद्धती तयार करू शकता.सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नका.लक्षात ठेवा जर एखाद्याला खूप निराश वाटत असेल किंवा स्वतःला संपवायचा,इजा करण्याचे विचार येत असतील,तर लगेच तुमच्या विश्वासू व्यक्तीशी बोला.आपल्या आई बाबासी बोला.आत्महात्या करणारी व्यक्ती आत्महात्या करण्यापूर्वी हजारो वेळा मनात मेलेला असतो.कमकुवत मनाचा व्यक्तीच आत्महत्या करतो.
खरं तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्येसारखा वाईट विचार येवूच नये.परिक्षेतील गुण हे एकच आत्महात्येच कारण आसू शकत नाही.तर विद्यार्थी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असू शकतात.बहुतेक वेळा एकच कारण नसते,तर मानसिक ताण,भीती,एकटेपणा आणि परिस्थितीचा दबाव यांचा एकत्रित परिणाम असतो.घरची मंडळी नेहमीच मुलांना अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण देत राहतात. तर काही विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच कमी गुण मिळण्याची भीती असते,आशा विद्यार्थ्यांत अपयश सहन करण्याचे धैर्य नसते.आज काल प्रत्येक माता पित्याच्या,नातेवाईकांच्या व समाजाच्या अपेक्षा विद्यार्थ्यांकडून वाढलेल्या आहेत.आपल्या पाल्याची कुवत न पहाता,आवडी निवडी विचारात न घेता त्यांना नेहमीच आपली मुलेमुली पहिल्या नंबरलाच यायला पाहिजे असा दबाव ते टाकत असतात.पालकांना हे सांगावेसे वाटते की तुम्ही त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या कडे लक्ष देता का? त्याच्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष द्या.पाल्याविषयी बारकाईने विचार करा.त्यांना नैराश्य,चिंता नी ग्रासले आहे का हे बारकाईने शोधून काढा.त्यांच्या मनाचा विचार करा.त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका तर ते वाढवा.कळी खुलण्या अधीच कोमेजू देवू नका .
आपल्या समाजातील माता पित्यात एक दुर्गुण लपलेला आहे.ते म्हणजे आपल्या पाल्याची तुलना आणि स्पर्धा नेहमीच त्याच्या मित्रांशी किंवा इतर विद्यार्थ्यांशी करतात.पालकांनी आपला पाल्य एकटाच का राहतो ? तो दुसऱ्याशी संवाद का साधत नाही ? हे लक्षात आल्यानंतर त्याच्या मनातील समस्या काय आहे ? तो कोणाशीही का बोलत नाही ? हे वेळेवर समजून घेतले पाहिजे. शाळेत,कॉलेजमध्ये किंवा सोशल मीडियावर त्याची कोणी छळवणूक करतो का? किंवा त्याला होणारा त्रास याबदल जाणून घेतले पाहिजे.पालक आपल्या पाल्यांसाठी नेहमीच सावध किंवा दक्ष असले पाहिजे.कौटुंबिक समस्या घरातील भांडणे, आर्थिक अडचणी किंवा अस्थिर वातावरण यामुळे त्याच्या कोवळ्या मनावर परिणाम होतो.तो इतरा कडील भारीचं मोबाईल पहातो.त्याचे आलीशान जीवन पहातो.इतरांचे “ आलिशान ” जीवन पाहून त्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटतो.त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यास आर्थिक परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे .
पालकांनो आपल्या मुलाना गुणांनसाठी नाही तर गुणवत्तेसाठी तयार करा.मुलाना जिवनाचा आनंद घेण्यासाठी शिक्षणाची कास धरण्याचे शिकवा.त्यांना शिकवा आपली संस्कृती जपण्यासाठी,ती वाढविण्यासाठी.यासाठी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण संस्कार द्या. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी यांनी मुलांना त्यांच्याबरोबर मित्राप्रमाणे,मन मोकळेपणाने प्रश्न विचरण्याची,मन मोकळेपणाने रहाण्याची प्रेरणा द्या.सर्व समाजातील मंडळीना महत्त्वाची गोष्ट सांगावयची म्हणजे आत्महत्या करणेही कोणत्याही समस्येचे समाधान नाही.विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा अडचणी ह्या तात्पुरत्या असतात हे विसरू नका.प्रत्येक आडचणीवर मार्ग निघू शकतो.पाल्यांना योग्य मदत,संवाद व समजूत मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते.” हा ही दिवस निघून जाईल.” हे प्रत्येकांनी कायम स्मरणात ठेवा.पालकांनी हे लक्षात ठेवा की जर एखादा विद्यार्थी खूप तणावात दिसत असेल तर त्याच्याशी शांतपणे बोला,त्याला दोष देऊ नका, त्याला त्यांच्या शिक्षकाकडे न्या.त्याच्या पालकाकडे न्या.त्यांची मदत घ्या किंवा एखाद्या समुपदेशकांची मदत घ्या.त्याला एकटं पडू देऊ नका.ती नवीन ऊमलणारी कळी भलतीच नाजूक असते त्यास जपा.उमलण्या पूर्वीच कोमेजून जावू देवू नका.
राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड – ६
९९२२६५ २४०७ .

