filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;
कंधार :(दिगांबर वाघमारे )
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्याच दिवशी, १५ जून रोजी कंधार तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत होणार आहे.या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि शासनाची मोफत पाठ्यपुस्तके देऊन ‘प्रवेशाचा आनंद उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर यांनी केले आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्याकडून दोन टप्प्यांत कंधार तालुक्यासाठी १ लाख १२ हजार ७७३ पुस्तके प्राप्त झाली होती त्या पुस्तकांचे वितरण १७ केंद्रांवरून शाळांना झाले आहे.बदललेल्या अभ्यासक्रमानुसार दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत मराठी माध्यमाची १ लाख ६ हजार ५९८, सेमी इंग्रजी माध्यमाची चार हजार,२७५ आणि उर्दू माध्यमाची १हजार ९०० अशी एकूण १ लाख १२ हजार ७७३पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत.ते शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना वाटप करव्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच तिसऱ्या टप्प्यातही उर्वरित पुस्तके येणे बाकी असून,ती लवकरच मिळतील असे गटशिक्षणाधिकारी वसंत मेटकर यांनी सांगितले.
पांडुरंग आघाव यांच्या नेतृत्वाखालील शिवकुमार कनोजवार,बालाजी काळे,ओमप्रकाश यरमे,प्रशांत नरहरे, ज्ञानेश्वर चाटे,राजेंद्र बिरादार,बालाजी निवळे,ज्योती स्वामी,एस.एस.मलगिरवार,जाधव एन.जी, कोसंबे एन.ए,आनंद तपासे यांच्यासह विशेष टीम आणि सर्व केंद्रप्रमुखांनी या वितरणासाठी परिश्रम घेतले आहेत.

