कंधार: प्रतिनिधी
जुन महिना संपत आला असला तरी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे लोहा कंधार तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहेत. सध्या लिंबोटी धरणात 27 द. ल. घ. मिटर (35) टक्के साठा उपलब्ध आहे. पावसाळा असल्याने येणाऱ्या काळात हे धरण पुन्हा भरणार आहे.अनेक गावातील शेतकऱ्यांचे पिके वाळून जात आहे त्यामुळे लिंबोटी धरणाचे पाणी लाभ क्षेत्रात तात्काळ सोडावे अशी मागणी माजी आमदार तथा शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्यध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.मानार प्रकल्पात मृत साठ्यापेक्षा २४ दशलक्ष घनमीटर(३५%) पाणी शिल्लक आहे, त्यामुळे जुलै मधील पाण्याने धरण पहिल्या टप्प्यात भरून जाईल पण शिल्लक साठ्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे कंधार – लोहा लाभ क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी कापूस व हळदीची लागवड केली असून, सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे संबंधित जलसंपदा विभागास लाभ क्षेत्रात पाणी सोडण्याच्या सूचना देऊन सहकार्य करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

