कंधार : प्रतिनिधी
महावितरण कंधार चा ढसाळ कारभार बंद करून, जागे होऊन ग्राहकांजा योग्य विद्युत पुरवठा करावा.
बहाद्दरपुरा गावचा फिडर बदलून पूर्ववत विज पुरवठा सुरळीत करावा. नागरी वस्तीतील घरावरुन गेलेले जिवघेणे विद्युत तार तात्काळ काढून टाकावेत यासह अन्य मागण्यासाठी दि.1 जुलै रोजी बहादरपुरा येथिल गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय समोर उपोषण पुकारले आहे.
सर्व ग्रामीण भागावर लादलेली अमानुष लोड शेडिंग तात्काळ बंद करावी. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी लागणारे साहित्य वेळोवेळी तात्काळ पुरवण्यात यावे.
जनतेच्या पैशातून नेमलेल्या विविध दुरुस्ती आणि देखरेख एजन्सी च्या कारभाराची सखोल चौकशी करावी.
अकार्यक्षम उप कार्यकारी अभियंता श्री मठपती यांच्या वर तात्काळ विभागीय कारवाई करावी. विद्युत वितरण कंपनी कडून ग्राहकांना मिळणा-या सोयी सुविधा संदर्भात दर्शनी भागात फलक लाऊन त्या संदर्भात जनजागृती करण्यात यावी. विद्युत वितरण कंपनी चे गाव स्तरावरील लाइनमन यांचे गावात च वास्तव्य रहावे तसेच ग्राम पंचायत कार्यालय येथे दर्शनी भागावर संपर्क क्रमांक फलक लावावा. पाऊस काळ व सणांचे गांभीर्य पाहता नेहमी प्रमाणे विद्यतपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा मागण्या आहेत. उपोषण स्थळी यावेळी उप कार्यकारी अभियंता विश्वनाथ मठपती, सहाय्यक अभियंता मुजीब पठाण, यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले. अँड मुकेश्वरराव धोंडगे, माधवराव पेठकर, गुरुनाथ पेठकर, उत्तम भांगे, मनोहर पेठकर, सरपंच प्रतिनिधी शंकर खरात, अँड शिवचरण भांगे, व्यंकट पेठकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

