गृहमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी – नांदेड भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

नांदेड ; प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिना ₹ १०० कोटी वसुलीचा आरोप उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी केल्यामुळे गृहमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन नांदेड भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, महानगर सरचिटणीस ॲड.दिलीप ठाकूर, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, व्यंकट मोकले, श्रावण भिलवंडे, मनपा विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, प्रवक्ते प्रल्हाद उमाटे, नांदेड उत्तर ग्रामीण मंडळ अध्यक्ष संतोष क्षिरसागर, कामाजी कदम, मारुती वाघ, महादेवी मठपती, व्यंकटेश साठे, सिद्धार्थ धुतराज, संयोजक भाजपा सोशल मीडिया राज यादव, रूपेंद्रसिंघ साहू आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *