
कंधार ; प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम अभियंता श्रेणी-१ सा.बां. उपविभाग, कंधार यांच्या दहशतीची तक्रार अर्जदार भास्करराव गणपतराव देशपांडे रा. उमरज ता. कंधार जि. नांदेड यांनी केली असून पावसाच्या पाण्याने शेती खरडुन जात असल्याची तक्रार तहसिलदार कंधार यांना लेखी निवेदनाद्वारे केली असून तात्काळ निवेदनाची दखल घेऊन न्याय मिळवून दिला नाही तर न्याय मिळेपर्यंत अमरण उपोषण आणि नंतर आत्मदहन करणार असा इशारा देण्यात आला .
याबाबत निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की अर्जदार भास्करराव गणपतराव देशपांडे रा. उमरज ता. कंधार जि. नांदेड हे रहिवाशी असुन माझी शेती उमरज ते दगडसांगवी रोडलगत असुन गट क्रं. ३२० हा असुन २०२२-२३ मध्ये माझ्या शेजा-यांनी शासनाची व माझी परवानगी न घेता रातोरात बळजबरीने पाईप रोड खोदुन टाकला होता त्या वर्षी कमी पाऊस होऊन ही शेत खरडुन गेले होते. शेती खरडुन गेल्यामुळे मी वेळोवेळी निवेदन देऊन ही शेवटी मला उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला विदुपन कादया अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे असे लक्षात आल्यावर ज्यानी पाईप टाकले त्यांनी काढुन रातोरात पाईप काढुन घेतले पण राज्य मार्ग झाल्यामुळे नवीन रस्ता होत असुन पुन्हा शेजा-यांनी सुमीत पाटील अभियंता यांच्यावर दबाव राजकीय आणल्यामुळे माझ्या शेतात सुमीत पाटील अभियंता पाईप टाकला आहे.
वेळो वेळी मी सुमीत पाटील यांना विनंती केली पण ते ऐकुन घेत नाहीत आम्हाला रोड सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे खाली सेमेन्ट नाली किंवा पाटींग व अन्य बाबी करण्यासाठी बजेट नसते व आम्ही काहीही करु शकत नाही शेत खरडुन जाईल किंवा नाही ते तहसिल कार्यालय बघुन घेईल असे ते फोनवर बोलत आहेत या बाबत दि. ०९/०१/२०२५ पासुन साहेब कार्यालयात भेटतील म्हणुन खुपदा गेलो कार्यालयात कोणताही अधिकारी भेटला नाही जर साहेबांनी पाईप टाकल्याने माझी शेती खरडुन वाहुन जाईल आणि मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मी आज रोजी निवेदन देऊन जर विचार केला गेला नाही तर उपोषण करेल तरी विचार केला गेला नाही तेर अमरण उपोषण आणि नंतर आत्मदहन करणार आहे
होणा-या परिणामाची सगळी जबाबदारी शासनाची राहील व हया सगळ्या प्रकरणा मध्ये सुमीत पाटील अभियंत्यामुळे घडला दोषी राहतील असे निवेदनात नमुद करण्यात आले .






