कंधार ; (दिगांबर वाघमारे )
गेल्या अनेक दिवसापासून कंधार शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले असून नागरिक नगरपालिका प्रशासनाप्रति रोष व्यक्त करीत असल्यामुळेच भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत सुरू करण्यात यावा याकरिता निवेदन भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी न पा प्रशासनास दिले.
कंधार शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रमजान ईद, रामनवमी या सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने दि २७ मार्च रोजी नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद केले की कंधार शहराच्या दोन्ही दिशेला मोठ्या प्रमाणामध्ये जलसाठा उपलब्ध आहे एका बाजूला जगतुंग सागर तर दुसऱ्या बाजूला मन्याड नदी लिंबोटीचे धरण आहे शहरास पाणीपुरवठा हा दोन्ही जलसाठ्यातून होतो परंतु नगरपालिकेच्या गलथान व अनियोजित कार्यप्रशासनामुळे शहरास आठ ते दहा दिवस पाणी मिळत नाही हे ढिसाळ नियोजनाचा निषेध करत निवेदन देऊन शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था केली पाहिजे

नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधा पुरवले पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी व कंधारवासी यांच्या वतीने दि ३० मार्च रोजी नगरपरिषद कार्यालय यावर हंडे मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे शहर मंडळाध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार ,रमेश पाटील लुंगारे ,अड सागर डोंगरजकर, प्रेमानंद गायकवाड, राम निलावाड, गणेश ठाकूर, अभिजीत इंदूरकर ,शुभम संगनवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


