कंधार/प्रतिनिधी
येथील महावीर नगर परिसरात शुक्रवारी रात्री दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात दहावीत ९१.८० टक्के गुण मिळविणारी श्रुती सुभाष वाघमारे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रुती ही लातूर येथील केशवराज विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने उज्ज्वल यश संपादन करून लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. तसेच कंधार येथील महात्मा फुले विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मानसी उमेश बिजले हिने ९०.४० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळविले. श्री शिवाजी कॉलेज कंधारची विद्यार्थिनी आकांक्षा वाघमारे हिने बारावी परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, जिद्द व सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक मयूर नळदकर, नगरसेवक दिलीप बसवंते, प्रदीप गरुडकर,ज्येष्ठ पत्रकार हाफीज घडीवाला, मिर्झा जमीर बेग, माधव भालेराव, गंगाधर बिजले, बाबुसिंह कछवा, तानाजी बसवंते, एस. पी. केंद्रे, मारोती गायकवाड, विलास कदम, लिंबाजी कंधारे, अशोक बसवंते, संभा बसवंते, चंद्रकांत गऊळकर, विद्यासागर वाघमारे, उमेश बिजले, प्रा. सुभाष वाघमारे तसेच सौ. रत्नमाला वाघमारे, डॉ. श्रद्धा वाघमारे आदी उपस्थित होते.

