लाचलुचपत ही कल्पना जेव्हा माणूस जन्माला आला व तो तुझे माझे करावयास शिकला तेव्हापासून चालत आलेली कुप्रथा आहे . याचा अर्थ एवढाच की लाचलुचपत ही आधुनिक काळातील गोष्ट नाही.चराचर सृष्टीत मानव समाजात जेव्हा सत्ता,संपत्ती आणि अधिकार याची जाणीव त्यांना झाली तेव्हापासून अशा प्रकारांना सुरुवात झालेली आहे.रामायण महाभारत काळात ही भ्रष्टाचार /लाच प्रकार पावलो पावली दिसून येतो.आर्य चाणक्य (कौटिल्य / विष्णूगूप्त )यांच्या अर्थ शास्र या प्राचीन भारतीय ग्रंथात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अपहार आणि भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार वर्णन केले आहेत. याचाच अर्थ असा की हजारो वर्षांपूर्वीही हा प्रश्न अस्तित्वात होता आणि आजही आहे.लाच म्हणजे एखादे काम करून घेण्यासाठी,नियमात बसत नसतानाही नियम मोडण्यासाठी,कोणाला तरी अनुचित फायदा मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी एखादा निर्णय आपल्या बाजूने वळवण्यासाठी दिलेली किंवा घेतलेली बेकायदेशीर रक्कम म्हणजे भ्रष्टाचार किंवा लाच होय.या भ्रष्टाचार मध्ये किंवा लाच लुचपतिमध्ये केवळ पैसाच येत नाही तर भेटवस्तू,सुविधा किंवा इतर कोणताही लाभ हा ही एक प्रकारचा भ्रष्टाचार मानला जातो.
सामान्य माणूस असो की शिकली सवरलेली व्यक्ती असो तो सरकारी कार्यालयात काम लवकर करून देण्यासाठी पैसे देतो.बडी मंडळी सुद्धा कंत्राट मिळवण्यासाठी अधिकाऱ्याला भेटवस्तू देतात.काही छोटे सोडा पण बडे अधिकारी,नेते सुद्धा चुकीचा अहवाल अनुकूल लिहिण्यासाठी लाच देवून समोरच्याचा फायदा करतात. आता हेच पहा ना शिवराज मोटेगावकर यानी काय केलं ते.हा मोटेगावकर गरीब पण होतकरू विद्यार्थ्याच्या जीवावर उठला आहे.त्याने विद्यार्थ्यांचे भविष्य आंधाकारमय करून टाकले आहे.गरीब विद्यार्थ्यांची गळचेपी झालेली आहे.कित्येक महाभाग परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी पैसे घेत आले आहेत.घेत आहेत व पुढे हा प्रकार चालू राहणार आहे.लाच लुचपतिचे अनेक प्रकार दिसून येतात.लाचलुचपत विविध स्वरूपात समाजात दिसून येते जसे की, चुकीचे काम करून घेण्यासाठी रोख पैसे देणे किंवा घेणे ,भेटवस्तू देणे ,कमिशन किंवा टक्केवारी घेणे,नोकरी किंवा पदाचे आश्वासन देणे,ओळख वापरून अनुचित फायदा मिळवणे ,कंत्राटे किंवा परवानग्या मिळवण्यासाठी दबाव आणणे,या प्रकारच्या भ्रष्टाचाराविषयी आपण माध्यमातून दररोज पहात असतो किंवा ऐकत असतो.पण , शिक्षणासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात जेव्हा अपवित्र घटना घडते तेव्हा समाजातील सर्वच घटक चक्रावून जातात.या शैक्षणिक भ्रष्टाचार मध्ये गुण वाढवणे,प्रवेश मिळवून देण्यासाठी गैरकृत्य करणे हे समाजासाठी पर्यायाने देशासाठी भयाण गैरकृत्य आहे.काही लोक राजकीय भ्रष्टाचार करतात. स्वतःचा प्रभाव टाकून नातेवाईकांना अनुचित लाभ मिळवून देतात.
मोटेगावकर यांनी केलेला गैरकृत्य हे परीक्षेतील अतिशय निच गैरप्रकार आहे.काही लोकांना वाटेल हा लाच लुचपतिचा प्रकार आहे का? होय, माझ्यामते काही परिस्थितीमध्ये हा भ्रष्टाचारचाच प्रकार मानला पाहिजे.कॉपी करण्यास मदत करणे,प्रश्नपत्रिका फोडणे, परिक्षकाला पैसे देऊन गुण वाढवणे हे सगळे भ्रष्टाचार मध्येच गणले जातात.काही महाभाग तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे परीक्षा देतात.तर काही प्रवेशासाठी किंवा निकालासाठी पैसे घेतात. सामान्य माणसाचं मत एवढच आहे की आर्थिक किंवा अन्य लाभ देऊन नियम मोडले जात असतील, तर तो स्पष्टपणे लाच लुचपत आणि भ्रष्टाचार आहे.लाच लुचपतिला आळा घालणार येथे कोण आहे ? येथे तर भ्रष्टाचाराच्या महासागरात पोहणारी माणसं आहेत. ज्याच्याकडून समाज आपेक्षा करतो तेच लाच लुचपतीच जाळे टाकून बसलेले असतात.मग याला आळा घालण्याचे मार्ग कोण शोधतील. याची सुरुवात आपले नेते,सरकार व प्रशासनातील अधिकारी वैयक्तिक स्तरावर स्वतः करून लाच घेणार नाही आणि देणार नाही असे ठामपणे ठरवले पाहिजे (हे केवळ स्वप्न आहे ) . सर्व भारतीयांना प्रामाणिकपणा आणि नैतिकता जपावी लागेल.जागरूक नागरिकांनी चुकीच्या गोष्टींची तक्रार करणे आवश्यक आहे.शैक्षणिक स्तरावर आगदी सुरवातीपासून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे;पण मोटेगावकर सारखे भ्रष्ट शिक्षक भेटले तर ? परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणने आवश्यक आहे.सरकार आणि प्रशासकीय स्तरावर डिजिटल सेवा वाढवणे गरजेच आहे.परीक्षा घेण्याच्या प्रक्रियांमध्ये सहजता आणि सोपेपणा आणले पाहिजे.मोटेगावकर यांच्यासारख्या शिक्षण प्रक्रियेला काळीमा फसणाऱ्यावर कठोर कारवाई आणि दंड ठोठावले पाहिजे.यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.पण येथील शासन बहिरे आहे.प्रशासन व न्याय व्यवस्था आंधळी आहे.येथील जनता मुकी आहे.त्यामुळे समाजातील भ्रष्ट लोकाचे फावते आहे.यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृती करावी लागणार आहे.यापुढे माध्यमे आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
आपल्या देशामध्ये केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकपाल यांसारख्या संस्था भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांवर काम करतात. पण या संस्थाही मगरीच रूप घेवून डोळे मिटून झोपण्यांचं सोंग घेतात.तसे पाहिले तर भारतातील लोकपाल ही संस्था उच्च पदावरील सरकारी अधिकारी,मंत्री आणि पंतप्रधाना विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.(लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३ अंतर्गत ही संस्था कार्य करते. )भ्रष्टाचाराच्या तक्रारी स्वीकारणे,मंत्री,खासदार,सरकारी अधिकारी यांच्याविरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची नोंद घेणे. तक्रारीची सखोल चौकशी व तपास करणे,तक्रारींची प्राथमिक चौकशी करून आवश्यक असल्यास तपास यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश देणे तसेच CBI व इतर संस्थांवर देखरेख करण्याचे काम लोकपाल करते.लोकपालबरोबरच केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission – CVC) ही भारत सरकारची सर्वोच्च दक्षता संस्था आहे.तिची स्थापना १९६४ मध्ये झालेली आहे.केंद्रीय दक्षता आयोगाची प्रमुख कार्ये आहेत भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे,केंद्र सरकारच्या विभागांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना करणे.प्रशासनावर देखरेख,विविध सरकारी कार्यालयातील दक्षता विभागांचे काम तपासणे. त्या बरोबरच तक्रारींची चौकशी करणे,सरकारी कर्मचारी विरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणे.ही संस्था ही CBI ला ही मार्गदर्शन करते
भारतीय लोकांना लाच म्हणजे एक सामान्य घटना वाटते.लाच दिल्या घेतल्या शिवाय काम होतच नाही ही भावना सर्व सामान्य लोकांच्या मनात पक्क घर करून बसलेली आहे.पण बाबानू लाच ही केवळ पैसे देणे-घेणे नाही हो तर लाच भ्रष्टाचार हे न्याय,समान संधी आणि समाजाच्या विश्वासाला बाधा आणणारी गंभीर समस्या आहे हे भारतीयांच्या डोक्यात आणखी भिनलेलं नाही. येथील शासन,प्रशासन,नेते व ढोंगी लोकांना लाच नावाचा कर्क रोग झालेला आहे.असा रोग पसरविणारे मोटेगावकर सारखे आता लाच नावाचं कर्करोग पसरवित आहेत.परीक्षेतील गैर प्रकारही भ्रष्टाचाराचे रूप आहे.या रोगाला जर हद्दपार करावयाचा असेल तर कष्ट,प्रामाणिकपणा, शिक्षण,कठोर कायदे आणि सामाजिक जागरूकता यांच्या मदतीने या समस्येला मोठ्या प्रमाणात आळा घालू शकतो.
नीट परीक्षेतील घोटाळे बाज लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.कारण नीट ही परीक्षा देशभरातील लाखो गरीब,कष्टकरी,मेहनती, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आहे.आई बाबांच्या कष्टांचे चीज करण्याचा मार्ग आहे.अशा परीक्षेमध्ये जर काही मोटेगावकर सारखे कोचिंग क्लासेस,एजंट किंवा इतर संबंधित व्यक्ती गैरप्रकार करून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करत असतील,तर त्यांच्यावर मृत्यूदंड सारखी कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.जेणे करून पुढे आशा गोष्टी पुन्हा कोणी करण्यास धजणार नाही.या लोकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे कारण यामुळे मेहनती विद्यार्थ्यांचे संरक्षण होणार आहे.अनेक विद्यार्थी दिवस-रात्र एक करून अभ्यास करून यश मिळवण्याचा प्रयत्न करतात.परीक्षेतील गैर मार्गामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी समान संधी हुकते.परीक्षेत गैरप्रकार घडले नाही तर आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या विद्यार्थांनां ही गुणवत्तेच्या जोरावर पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो.निर्दोष परीक्षा घेवून शिक्षण व्यवस्थेवरिल विश्वास टिकवणे महत्वाचे आहे.परीक्षेची पारदर्शकता आणि न्याय टिकवणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत .भारतातील शासन व्यवस्था,प्रशासन व्यवस्था,नेते आणि माध्यम हे सगळेच हसल्या सारखे करतात तर काही रडल्या सारखे करतात. घटना घडल्यानंतर चार दिवस सर्वच जनता,नेते, माध्यम ‘ भ्रष्टाचार ‘ प्रश्नाला डोक्यावर घेवून नाचतात.सर्वसामान्याला वाटते आता भ्रष्टाचार करणाऱ्यांचे काही खरे नाही.चार दिवसाला हा आपला मुका समाज गप्प बसतो.पुढे त्या गुन्हेगारच काय झालं कोणालाच कळत नाही.या भ्रष्ट क्लासेस विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना मोठे दंड ठोठावले पाहिजे.त्या क्लासेसची मान्यता रद्द करून,संबंधित व्यक्तींना कारावास झालाच पाहिजे.भ्रष्ट क्लासेस वाल्यांना भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्यास बंदी घालावी ही समाजाची अपेक्षा आहे.तसेच भ्रष्टाचारात गुंतलेल्या पालकांना ही शिक्षा व्हावी ही समाजाची अपेक्षा आहे.शिक्षण हे व्यवसाय नसून राष्ट्र निर्मितीचे साधन आहे. वर्ग खोलीतच आधुनिक भारताची घडण होत असते.परीक्षेतील माफीया विद्यार्थ्यांच्या स्वप्नाशी दूष्टपणे खेळत आहेत.या खेळणाऱ्या माफियांना कायद्याने कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.जेणेकरून प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
नीट ही परीक्षा देशातील लाखो ( बावीस लाख )विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे.डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक होतकरू,अभ्यासू आणि गरीब विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून या परीक्षेची तयारी करतात.अनेक कुटुंबे आर्थिक अडचणी असूनही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा त्याग करतात.अशा परिस्थितीत जर काही कोचिंग क्लासेस किंवा संबंधित व्यक्ती गैरप्रकार करून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवत असतील,तर हा केवळ कायद्याचा भंग नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर घाला आहे.गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे महागड्या क्लासेसची सुविधा नसते.ते स्वतःच्या जिद्दी वर आणि कष्टावर यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे,जर काही लोक पैशाच्या जोरावर प्रश्नपत्रिका फोडत असतील,फसवणूक करत असतील किंवा अन्य अनैतिक मार्गांचा अवलंब करत असतील,तर प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होतो.यामुळे गुणवत्ते पेक्षा पैशाला महत्त्व मिळते आणि शिक्षण व्यवस्थेवरिल विश्वास डळमळीत होतो.
शिक्षण हे समाजाला घडवणारे सर्वात प्रभावी साधन आहे.या क्षेत्रात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि समान संधी या मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे.मी वारंवार त्या माफियाना शिक्षा व्हावी असी मागणी समाजामार्फत करत आहे.गैरप्रकार करणाऱ्या क्लासेस वर कठोर कारवाई केल्यास भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना दंड,कारावास आणि संस्थांची मान्यता रद्द करण्यासारख्या कठोर शिक्षा दिल्या पाहिजेत.सरकार,परीक्षा संस्था आणि समाज यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण केले पाहिजे.मेहनती आणि होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाशी खेळणाऱ्यां माफियाना माफी नसावी.
सारांश रूपाने सांगावयाचे झाल्यास माझा हा लेख म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनातील भावना,वेदना आणि दुःख व्यक्त करणारा लेख आहे.परीक्षा माफिया हे समाजातील कीड आहे.ही कीड कोवळ्या कळ्यांना,फुलांना कुरतडून टाकत आहे.या किडवर कितीही फवारा करा यांची पिढी मरण्या ऐवजी, संपण्याऐवजी सशक्त तगडी बनत आहे.ही माफिया टोळी नीट परीक्षेत गैरप्रकार करून होतकरू,अभ्यासू आणि गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे.अन्याय करणाऱ्या क्लासेस वाल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.यामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टांना योग्य न्याय मिळेल.राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड – ६
९९ २२६५ २४०७ .

