
कंधार( दिगांबर वाघमारे )
कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सहभागातून भक्तिमय वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या नामस्मरणाने परिसर भक्तिमय केला.
या वारी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती, शिस्त, एकता आणि भक्तीभाव यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविणारा हा उपक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष संभाजीराव पाटील केंद्रे, संस्थेचे सचिव तथा चेअरमन शिवाजीराव पाटील केंद्रे आणि प्राचार्या रेखाताई गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव तथा चेअरमन शिवाजीराव पाटील केंद्रे, प्राचार्या रेखाताई गित्ते, पर्यवेक्षक अमित लोंड, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्यंकट पुरमवार, मोहित केंद्रे, प्रा. राहुल गित्ते, सूर्यकांत श्रीमंगले, चंद्रकांत पडलवार, प्रा. गोविंदराव आडे, प्रा. स्वाती रत्नगोळे, कृष्णा केंद्रे, किशन ठोंबरे, शिवाजी मेंडके, प्रा. विजय राठोड, प्रा. अमित केंद्रे, प्रा. पंकज पाटील, प्रा. विक्रम लुंगारे, अनिल बोईवार, महेंद्र बोराळे, पत्रकार एस. पी. केंद्रे, बालाजी केंद्रे, संभू वाघमारे, परमेश्वर निलेवाड, अविनाश केंद्रे, मच्छिंद्र नाईक, राजीव केंद्रे, प्रकाश मुंडे, गणेश केंद्रे, माधव कदम, सचिन पांचाळ तसेच शेकापूर येथील भजनी मंडळी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षक अमित लोंड यांनी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय वारी सोहळ्याचे ग्रामस्थांनीही कौतुक केले.





