कंधारच्या युवकांचे मानबिंदू राजे शहाजी नळगे….

उत्तम शेतकरी व राजकीय नेतृत्व असलेला युवा नेता

कंधार ; दिगांबर वाघमारे

शहाजी नळगे यांचा जन्म १६/१०/१९७५ रोजी सधन व शिस्तप्रिय कुटूंबात झाला.नांदेड जिल्हाचे भुमिपुत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री,नांदेड जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.

अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष
अरविंदराव नळगे (दादा) व नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांच्या सुसंस्कृत शिकवणीत शहाजी नळगे यांची  जडण घडण झाली.

अन्य पालकांप्रमाणे आपल्या मुलांनी शिकाव हा वडीलांचा ध्यास आणि ते पुर्ण करण्यासाठी बालवयात धडपड चालुहोती.दहावी ,बारावी ,पदवी ,पदवित्तर शिक्षण झाले.एखादी उत्तम नौकरी करावी अशी इच्छा बाळगुळ तयारी चालवली देखील परंतु मुळात पिंड नेतृत्व करण्याचा . यांच्या घरात वडिलांचा राजकीय वारसा आसल्याने राजकारणात त्यांना जास्तीची मेहनत करावी लागली नाही.घरी शेती असल्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा प्रत्यक्ष अधुनिक शेती करण्याकडे वळवला.
राजकारणा पेक्षा शेतीकडे महत्व त्यांचे विशेष असते.

तञंज्ञानाच्या सहाय्याने अधुनिक शेतीवर जोर धरला त्यानी सुधारीत शेती केली.अनेक कृषी मेळाव्यात,कृषी प्रदर्शन या मध्ये भाग घेतला.त्यातुनच त्यांनी शेतीमध्ये नवनवे प्रयोग राबवले .आपल्या शेतीनिष्ठ मित्रांना सोबत घेऊन शेती सहली काढल्या . व्यवसाय करुन उत्तम युवा शेतकरी म्हणून ओळख त्यांनी मिळवली .

आज ते राजकारणात सक्रीय असले तरी ते पहीले प्राधान्ये हे शेतीलाच देत असतात.रोज सकाळी चार वाजता पहाटे उठुन ते शेतात जावून दिवस भराच्या कामाचे नियोजन लावुन पाठपुरावा करतात .काम करायचे नसेल तर चालेल पण शेती मायच्या कामात हयगय ते खपुन घेत नाहीत.म्हणूनच शेती उत्पनात ते बादशाहा आहेत.

सर्व तरुणांचे आयकॉन व युवकांचे मानबिंदू शहाजी अरविंदराव नळगे हे केवळ वडिलांचा वारसा चालवण्यासाठी राजकारणात आले.आज ते एका वार्डाचे नगरसेवक असले तरी राजकारणातील सर्व खाचखळगे चागलेंच जाणुन आहेत.”दोस्तासोबत दोस्ती जिवापार …आणि दुश्मनासोबत सच्ची व कट्टर दुश्मणी हे तेही निष्ठेने नळगे परीवार करतात जे सर्वांनाच व पंचक्रोशित प्रसिद्ध आहेत.

राजे म्हणून तरुणांचे आदर्श असणारे राजे शहाजी नळगे यांंना गल्लीबोळातील कोणत्याही तरुणाचा ,नागरीकाचा फोन ते प्रत्यक्ष स्वतः उचलतात ते जनतेचे लोक प्रतिनिधी म्हणून स्वतः लक्ष घालुन सुख दुःख असेल त्यांच्या हाकेला धावून जातात.

राजा म्हणल्याने कोणी राजा होत नाही परंतु आपल्या कामाच्या पावतीने तरुणांच्या अंतकरणात अधिराज्य गाजवत तरुणांनी व सच्चा दिलाच्या मित्र मःडळीने स्वतः होवून राजे म्हणून शहाजी नळगे यांना स्विकारले व राजे शहाजी नळगे मित्र मंडळाचे खरेखूरेच राजे आहेत हे या मित्रमंडळाचे व त्यांचा संपर्कात आलेले कोणीही असो त्यांना राजे शहाजी नळगे म्हणूनच स्विकार करतात यात शहाजी नळगे यांच्या कार्याचा मोठेपणा निश्चितपणे दडला आहे.

आता राजकारणाचे धडे गिरवताना ते आता कर्तगार व मुत्सदी राजकारण्यासारखे काम करत आहेत म्हणून सर्व कंधार शहरांचा कारभार चालवण्यात त्याचा आता हात कोन्ही धरत नाही त्यांना राजकारणाचे बाळकडू आदरणीय अरविंदराव दादा यांच्या कडूनच भेटले असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

पुर्वी राजकारणात काम करतांना संघटन आसावे असे त्यांना नेहमी वाटत होते.परंतु म्हणावे तसे संघटन होत नव्हते.त्यांनी आपल्या भुमिका बदलली आणि कमी कालावधीत शहाजी राजे नळगे हे नाव तरुणांच्या तोंडात व टाळक्यात घोळु लागल .

आली अडचण लावा फोन आणि प्रश्न खलास असा प्रयोग चालु केला . आपल्या गोड वाणीतुन व शांत स्वभावातुन शहरात मोठ्या प्रमाणात युवा संघटन निर्माण केले आहे. प्रत्येकांच्या सुखा -दुखात व अडिआडचणीत धावुन जात असल्याने लोकांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकी निर्माण झाली आहे.आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने शहरातील युवकांचे शहाजी नळगे यांच्यावर असलेले प्रेम दिसुन आले.शहाजी नळगे कंधार शहराच्या विकासाच्या कामासाठी बाहेर गावी मुकामी तळ ठोकून असल्याने २०२० मध्ये त्यांना शुभेच्छा प्रत्यक्ष देता आल्या नसल्या तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून अख्खा दिवसच नाही तर आठ दिवसा पासून शुभेच्छाचा वर्षाव सर्वाचे लक्ष वेधत आहे.

असा बहुआयामी व सयमी नेता कुणाचा दादा ,भाऊ ,आणि अण्णा होतो.हे समजतच नाही.येणारा काळ त्यांच्यासाठी निश्चितपणे मोठ यश घेवून येणार आहे.मोठ नेतृत्व अधिक मोठ होणार आसल्याच्या खुणा खुणावात आहेत.त्यांच्या ४५
वा वाढदिवसा निमित्तानं खुप खुप शुभेच्छा .

*शहाजी राजे नळगे मित्र परीवाराची साथ
डॉ.दिपक बडवणे ,गुलाबराव नळगे ,शितल भगत ,बापुराव महाराज,बंडू कांबळे, सुहास कांबळे ,सुरेश राठोड ,संतोष कुंभारगावे ,प्रदिप मंगनाळे ,मिलींद गोधने,मोहित केंद्रे ,बालाजी बडवणे ,सुनिल परळकर ,अमीन भाई ,शिवाजी पवार ,नांगेश पवार ,
बंडु अण्णा मामडे ,भगवान पाटील जाधव ,नागरगोजे सर ,
अमर लाला ,गठ्ठू भावजी ,किशनराव तपासे , व समस्त शहाजी राजे मित्र मंडळी व मित्र परीवारांनी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *