मोहसीन शेख च्या परिवाराला न्याय मिळवून देण्याची इन्साफ संघटनेची कंधार तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदनाद्वारे मागणी.

कंधार/प्रतिनिधी

सुमारे सात वर्षापूर्वी सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकले नसलेल्या परंतु टाकली हे गृहीत धरुन सॉफ्टवेअर इंजीनिअर मोहसीन शेखची हत्या केली होती.आता पर्यत पीडिताच्या परिवाराला न्याय भेटलेला नाही. याचा निषेध करत कंधार ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफच्यावतीने जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या आदेशावरून तहसील व्यंकटेश मुंडे यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना आज गुरुवार दि.३ जुन रोजी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, २ जुन २०१४ रोजी काही समाजकंटकांनी सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर त्या पोस्टचा आधार घेत हिंदुराष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून निष्पाप व निरपराध असलेल्या व त्या पोस्टशी काहीही सबंध न सॉफ्टवेअर इंजीनिअर मोहसीन शेखची हत्या केली होती. आज

सात वर्ष झाले त्यागंभीर घटनेला मात्र अजून पर्यंत पीडिताच्या परिवाराला न्याय भेटलेला नाही. याचा निषेध करत कंधार ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफच्यावतीने जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या आदेशावरून तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवन्यात आले.

यावेळी तन्जीम ए इन्साफ संघटनेचे कंधार तालुका अध्यक्ष शेख शादुलभाई, शेख सर , आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *