कंधार प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील पेठवडज या गावात गेल्या अनेक वर्षापासून हत्तीरोगाचे थैमान चालु असुन या रोगामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढे भयानक चित्र समोर असताना शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या हत्तीरोगामुळे शरिराचे अवयव मोठे झाल्यामुळे हत्तीरोग ग्रस्तांना कोणतेच काम करता येत नाही. हाताला काम नसल्यामुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. या हत्तीरोगग्रस्थाना शासनाची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी केली आहे
.
कंधार: तालुक्यात चिकित्सालय स्थापन झाल्यानंतर हत्तीरोगाचे नियंत्रणात येईल असे वाटले होते परंतु आरोग्य विभागाला म्हणावे तसे यश आले नाही.आहे. २०१८ पूर्वीचे जुने रूग्ण तब्बल १४६ असून महिला रुग्ण संख्या १०४ असल्याचे समोर आले आहे.
हत्तीरोग हा ‘क्युलेक्स’ या मादी डासाने रात्री चावा घेतला तर होतो. या रोगामुळे हाता पायावर सूज येणे.अंडवृद्धी आदी लक्षणे दिसतात हत्तोरोगावर रामबाण उपाय नसला तरी रोग नियंत्रणात ठेवता येतो.असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते परंतु प्रत्यक्षात कृती काहीच होत नसल्याचा आरोप नारायण गायकवाड यांनी केला आहे. गावातून मोठा नाला वाहत असल्याने या नाल्यात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असल्याने या डासाची निर्मिती होत आहे. या संदर्भात अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही कायमस्वरूपी उपाय अद्यापही सापडला नाही. पेठवडज गावातील अनेक हत्तीरोगग्रस्तांना शासनाचे पण मानधन मिळत नसल्याने या सर्व लोकांना घेऊन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची भेट घेऊन या बाबीची सविस्तर माहिती नारायण गायकवाड यांनी दिली व या हत्तीरोगग्रस्तांना तात्काळ शासनाचे मानधन लागू करा अशी मागणी करण्यात आली आहे.


