भारतावर आक्रमण करण्यासाठी इंग्रज, फ्रेंच,पोर्तुगीज,डच, सिद्धी, मुघल अशा अनेक परकीय सत्ता भारतात आल्या त्यांनी वेगवेगळ्या भागात आपल्या वखारी स्थापन केले आहे तसेच इंग्रज ही भारतात व्यापारी म्हणून आले, आणि येथे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून त्यांनी येथील अज्ञानी,अशिक्षित लोकांच्या वेडगळ वागणुकीचा, व धार्मिक अंधश्रद्धेचा फायदा घेऊन व गटबाजी करून राज्यकारभार सुरू केला. त्यामुळे त्यांचा भारतावर एक छत्री अंमल सुरू झाला.1857 च्या उठावानंतर राणीने जाहीरनाम्यात सर्वांना समान दर्जा दिला जाईल,असे सांगितले. त्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. स्वतःच्या फायद्यासाठी व लष्कराच्या जलद हालचाली साठी वेगाने जाणे येण्यासाठी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू केली.भारतभर रस्त्याचे जाळे उभारले.भारतीयांना भौतिक सुविधांचा फायदा झाला.त्यामुळे या प्रांतातील लोक त्या प्रांतात जाऊ लागले. सर्वत्र दळणवळण वाढले.एकमेकांशी संवाद होऊ लागले आणि यामधूनच सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागली. याचाच फायदा घेऊन भारतीयांनी राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथील तेजपाल संस्कृत विद्यालयात करण्यात आली. दूष्ट इंग्रजांनी 16 ऑक्टोबर रोजी बंगालच्या फाळणी केल्यामुळे ती रद्द करण्यासाठी राष्ट्रीय शोक दिन सर्वत्र साजरा करण्यात आला.
त्याची माहिती आपण या ठिकाणी करून घेत आहोत…
भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी राष्ट्रीय सभेने पुढाकार घेतला.
सन 1885 ते 1905 पर्यंत मवाळांनी सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी कंबर कसली. या काळात त्यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुता या मूल्यांचा आधार घेऊन इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी त्यांना आशा होती,
गोपाळ कृष्ण गोखले,सुरेंद्रनाथ बॅनर्जी,फिरोजशहा मेहता यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करुन आपले विचार इंग्रजा पर्यंत पोहोचण्या साठी पुढाकार घेतले होते. शिकलेल्या लोकांना नोकरी मिळावी,वाढत चाललेल्या लष्करी खर्चात कपात करण्यात यावी,
भारतीय लोकांना कायदेशीर हक्क मिळावेत म्हणून त्यांनी विविध ठराव मांडले होते.जहाल मतवादी युग1905 ते 1920 पर्यंत होते. भारतातील सर्व नेते जात
,धर्म,भाषा बाजूला करून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्रित यावे असे ठरले. केसरी आणि मराठा वृत्तपत्रातून सरकारच्या दडपशाहीवर घणघणाती टीका करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले.केसरी व मराठा वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव आणि राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी.
या हेतूने गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केले. मवाळांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीचा पाया जहालांनी पुढे पुढे नेला. पुणे या ठिकाणी उंदरापासून होणारा प्लेग हा रोग 1897 मध्ये फारच फोफावला.शेकडो लोक मरण पावले. इंग्रजांनी घरात झडत्या घेण्याचे सत्र सुरू केले. गोरगरीब लोकांवर जबरदस्ती केली. राॅड या अधिकाऱ्यांनी नंगानाच सुरू केला, तेव्हा चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला. याच भानगडीतून लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केला. बंगाल हा फार मोठा प्रशासकीय प्रांत होता. प्रशासनाच्या सोयी साठी हे कारण दाखवलं परंतु खरं कारण हिंदू आणि मुस्लिम यांच्या मध्ये भेदभाव निर्माण करून राज्य चालवायचे होते. मुस्लिम बहुसंख्यांकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्यांकांचा पश्चिम बंगाल असे दोन विभाग करून हिंदू मुस्लिम मध्ये फूट कायमची पाडण्यात आली. मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली.स्वातंत्र्य चळवळीला ही गोष्ट खिंडार पाडणारी होती. त्यामुळे संपूर्ण भारतातील लोक एकत्रित आले. आणि 16 ऑक्टोंबर रोजी फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले गेले.
ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर भारतीय लोकांनी बहिष्कार टाकला. वंगभंग आंदोलनेचे नेतृत्व आनंद मोहन बोस, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले.
या सर्वांच्या दबावामुळे इंग्रजांना 1911 साली बंगालची फाळणी तातडीने रद्द करावी लागली. हे एकीचे फळ होते. कोणतीही काम करते वेळेस एकीने जर आपण राहिलो तर आपल्या स्वातंत्र्यावर कोणीही घाला घालणार नाहीत. मित्रांनो एक काठी एक माणूस मोडू शकतो, परंतु पाच काठ्या एकत्रित बांधल्यानंतर त्या मोडू शकत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी एकमताने एक विचारांने आपले स्वातंत्र्य टिकवावे.तरच आपण महासत्ता बनवू शकतो. सध्या सर्वत्र दहशतवाद,नक्षलवाद, वसाहतवाद,प्रांतवाद, जातीयता सुरू आहे. यातून बाजूला होऊन सर्वजण आपण सर्वधर्मसमभावाची विचारसरणी ठेवून एकत्रित राहू या. विविधतेत एकता हीच आपणाला शोभून दिसते. सर्व विधायक कार्यासाठी आपण एक आहोत. हे कदापि विसरू नये.शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
खैरकावाडी ता.मुखेड

