श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे श्री शिवाजी काॅलेज कंधार येथील मराठी विभाग प्रमुख आणि एन सी सी चे कॅप्टन मेजर डॉ दिलीप सावंत सर शनिवार दि ३१ जानेवारी २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत. श्री शिवाजी काॅलेज कंधार येथे आज त्यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न होत आहे. शिवाय गौरव ग्रंथाचे प्रकाशन पण याच कार्यक्रमात होणार आहे. त्याबद्दल माझे हे चार शब्द. प्रथमतः सरांना सेवापुर्तीच्या शुभेच्छा !! सरांना सेवानिवृत्त निरोगी दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा!!!
मुळातच मी माझे महाविद्यालयीन शिक्षण अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे घेतलो आहे. म्हणजेच श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी काॅलेज कंधार येथे मी माझे महाविद्यालयीन शिक्षण घेतलो नाही. या अर्थाने मी श्री शिवाजी काॅलेज कंधार आणि मेजर प्रा डॉ दिलीप सावंत सरांचा प्रत्यक्ष विद्यार्थी नाही आहे. पण एवढे मात्र खरे आहे की मी एक संपूर्ण दिवस सरांसोबत होतो.
खरे तर एकाच भेटीत, एकाच दिवसात,पहिल्याच भेटीत कोणाविषयी मत बनवणे आणि ते सार्वत्रिक करणे तितके इष्ट नाही. पण त्या दिवशी सर आणि मी पण एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. योगायोगाने तिथे १००-१२५ श्रोते उपस्थित होते. तो सार्वजनिक कार्यक्रम होता श्री देविदासराव वाघमारे यांच्या गुराख्या पासून गुरुजी या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ. सर मला एकट्याला खोटे नाटे बोलू शकतील, पण १००-१२५ जणापुढे कोणताही व्यक्ती खोटे नाटे बोलू शकत नाही. यास काही राजकारणी अपवाद असतील. तो भाग वेगळा!!! हे पण तेवढेच खरे आहे. म्हणूनच मी हा लेखन प्रपंच हाती घेतला आहे.प्रा डॉ दिलीप सावंत सर म्हणजे हाती पडले की सोने झाले. प्रा डॉ दिलीप सावंत म्हणजे सहवासात आले की व्यक्तीमत्व खुलले, फुलले. असे मी म्हटलं तर ते धाडसाचे होणार नाही. कारण गुराख्या पासून गुरुजी या आत्मकथनपर पुस्तकाच्या मनोगतामध्ये लेखक श्री देविदासराव वाघमारे म्हणतात की मी प्रा डॉ दिलीप सावंत यांना माझे पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वीच केवळ हस्तलिखित वाचायला दिलो होतो. तर त्यांनी त्या हस्तलिखितास चक्क प्रस्तावना लिहून दिली आणि माझ्या लेखनात मोलाची भर घातली. असे न मागता देणारे हे सर आहेत. जो देतो तो देव असतो. असे मी म्हटलं तर ते मात्र धाडसाचे होईल. शिवाय दस्तुरखुद्द सावंत सरांना पण आवडणार नाही, पचणार नाही, रुचणार नाही.
मला वाटते की प्रा डॉ दिलीप सावंत सर आणि माझ्यात दोन साम्यस्थळे आहेत. त्यातील पहिले म्हणजे सरांसारखच् मी पण कंधारेवाडी येथून फुलवळ द्वारे धर्मापुरी ता परळी वैजनाथ येथे नोकरी करत आहे. हे पण अंतर १००- १२५ किमी आहे. तर सरांचे गाव पण कंधार पासून तेवढ्याच अंतरावर आहे. मी सध्या अहमदपूर येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे सन्मित्र प्रा ज्ञानेश्वर गायकवाड सर मला नेहमी म्हणतात की तुम्ही आहेत नांदेडचे, राहतात लातूरमध्ये आणि ड्युटी करतात बीडमध्ये. एकंदरीत तुमचा संपर्क आणि वावर तीन जिल्ह्यात आहे.
दुसरे साम्यस्थळ म्हणजे एन सी सी विभागामुळे असेल कदाचित, पण एवढे एक खरे आहे म्हणून ते बरे आहे. ते म्हणजे In campus आणि अगदी Out of campus सुद्धा सरांच्या अवतीभवती विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा घोळका असतो. अवतीभवती विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा घोळका असण्यासाठी अगोदर त्या घटकासाठी, या येथे विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा मनात थोडाबहुत तरी पुळका असावा लागतो. तो सरांकडे आहे. त्यामुळे त्यांना हे शक्य झाले आहे. सर आणि माझ्यात हे दुसरे साम्यस्थळ आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही.याहून महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा घोळका सहजपणे सोबत राहत नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्याच भाषेत समजून सांगावे लागते. त्यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या एवढेच लहान व्हावे लागते. हे पण अगदी सोपे आहे. हे तर कुणीही करु शकतो. पण हे करताना, समजून सांगताना, त्यांना समजून पण घ्यावं लागतय! हे मात्र अवघड काम आहे. आणि हे अवघड काम सर प्रामाणिकपणे करतात. म्हणून त्यांच्या आजुबाजूला विद्याथ्यांचा घोळका असतो. एकंदरीतच सर आपल्या देवता सोबत शिष्टाईने आणि सौजन्याने वागतात.विद्याथ्यांना दुसरे काही पाहिजे नसते.
एका गोष्टीसाठी मात्र मला सरांचा हेवा वाटतो. तो म्हणजे सरांना केवळ आणि केवळ १०० रुपयात सावलीतली नोकरी मिळाली आहे. आणि मला मात्र……………..!!!!!!
प्रा डॉ दिलिप सावंत सरांना परत एकदा सेवापुर्तीच्या शुभेच्छा. सरांचे उर्वरित सेवानिवृत्त आयुष्य निरोगी राहण्यासाठी निर्मिकाकडे एक प्रार्थना करतो आणि थांबतो.प्रा भगवान आमलापुरे
फुलवळ
द्वारा कै शं गु ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
धर्मापुरी ता परळी वैजनाथ
संपर्क : ९६८९०३१३२८

