यशाचा मार्ग कधीच सरळ नसतो तो वळणावळणाचा, खाचखळग्यांनी भरलेला आणि अनेक आव्हानांनी सजलेला असतो. काहींना वारशाची साथ लाभते, तर काहींना परिस्थितीशी झुंज देत स्वतःच आपला मार्ग घडवावा लागतो. अशा वेळी जे लोक आपल्या जिद्दीच्या बळावर उभे राहतात, तेच खऱ्या अर्थान प्रेरणास्थान ठरतात. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांमध्ये ठळकपणे उभे राहणारे नाव म्हणजे रूपेश पाडमुख.
नांदेडच्या पत्रकारितेच्या विश्वात त्यांनी उभारलेले दैनिक समीक्षा हे केवळ वृत्तपत्र नाही, तर समाजाशी जोडलेली एक जिवंत चळवळ आहे. ८ मार्च २००८ रोजी सुरू झालेल्या या दैनिकाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली.
व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन समाजहिताची भूमिका जपणारे
वैशिष्ट्य आहे. माध्यम म्हणून त्यांनी याची जपणूक केली हेच त्यांच्या कार्याचे खरे रूपेश पाडमुख हे केवळ संपादक नाहीत, तर एक द्रष्टे समाजकर्ते आहेत. मंथन क्रिएटिव्ह, पत्रकार प्रेस परिषद, मीमांसा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवतात. त्यांच्या उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांचा सन्मान आणि प्रोत्साहन याला विशेष स्थान आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या पुरस्कारासहीत कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला
जातो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या नावाने पुरस्कार देत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत गुरुरत्न पुरस्कार देऊन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो.
देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव ही त्यांच्या कार्याची वेगळी ओळख आहे. स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार देऊन समाजातील कर्तृत्ववान अधिकारी महिलांना प्रेरणा दिली जाते. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे त्यांचे प्रेरणादायी कार्य गेली दीड दशकापेक्षा अधिक काळापासून अखंड सुरू आहे.
रूपेश पाडमुख यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची वन मॅन आर्मी ही ओळख. संपादक, वृत्तसंपादक, लेखक,उपसंपादक अशा अनेक जबाबदाऱ्या ते एकट्याने समर्थपणे पार पाडतात. मागील सतरा वर्षां पेक्षा अधिक काळापासून ते दैनिक समीक्षाचा गाडा सातत्याने आणि यशस्वीपणे पुढे नेत आहे.
.
पत्रकारितेच्या पायाभूत घटकांपैकी एक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती त्यांची आत्मीयता विशेष उल्लेखनीय आहे. हॉकर्सच्या विद्यार्थ्यांचा सत्कार,.’ .पत्रकार-छायाचित्रकार-मशीन ऑपरेटर यांचा गौरव, तसेच गरजू कुटुंबांना मदतीचा हात यातून त्यांच् १या प्रत्यय संवेदनशीलतेचा येतो आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी सामाजिक जबाबदारी पार वापाडत मदतीचा हात पुढे केला.
, रुग्णांना बेड व ऑक्सिजनची व्यवस्था, तसेच मुख्यमंत्री मदत निधीसाठी योगदान या सर्व माध्यमातून त्यांनी मानवतेची खरी सेवा केली.
यशाचा मार्ग कधीच सरळ नसतो तो वळणावळणाचा, खाचखळग्यांनी भरलेला आणि अनेक आव्हानांनी सजलेला असतो. काहींना वारशाची साथ लाभते, तर काहींना परिस्थितीशी झुंज देत स्वतःच आपला मार्ग घडवावा लागतो. अशा वेळी जे लोक आपल्या जिद्दीच्या बळावर उभे राहतात, तेच खऱ्या अर्थान प्रेरणास्थान ठरतात. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांमध्ये ठळकपणे उभे राहणारे नाव म्हणजे रूपेश पाडमुख.नांदेडच्या पत्रकारितेच्या विश्वात त्यांनी उभारलेले दैनिक समीक्षा हे केवळ वृत्तपत्र नाही, तर समाजाशी जोडलेली एक जिवंत चळवळ आहे. ८ मार्च २००८ रोजी सुरू झालेल्या या दैनिकाने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली. व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन समाजहिताची भूमिका जपणारे वैशिष्ट्य आहे. माध्यम म्हणून त्यांनी याची जपणूक केली हेच त्यांच्या कार्याचे खरे रूपेश पाडमुख हे केवळ संपादक नाहीत, तर एक द्रष्टे समाजकर्ते आहेत. मंथन क्रिएटिव्ह, पत्रकार प्रेस परिषद, मीमांसा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवतात. त्यांच्या उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांचा सन्मान आणि प्रोत्साहन याला विशेष स्थान आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या नावाच्या पुरस्कारासहीत कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला जातो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत गुरुरत्न पुरस्कार देऊन समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो.
देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव ही त्यांच्या कार्याची वेगळी ओळख आहे. स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार देऊन समाजातील कर्तृत्ववान अधिकारी महिलांना प्रेरणा दिली जाते. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे त्यांचे प्रेरणादायी कार्य गेली दीड दशकापेक्षा अधिक काळापासून अखंड सुरू आहे.
रूपेश पाडमुख यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची वन मॅन आर्मी ही ओळख. संपादक, वृत्तसंपादक, लेखक,उपसंपादक अशा अनेक जबाबदाऱ्या ते एकट्याने समर्थपणे पार पाडतात. मागील सतरा वर्षां पेक्षा अधिक काळापासून ते दैनिक समीक्षाचा गाडा सातत्याने आणि यशस्वीपणे पुढे नेत आहे.
पत्रकारितेच्या पायाभूत घटकांपैकी एक असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती त्यांची आत्मीयता विशेष उल्लेखनीय आहे. हॉकर्सच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, पत्रकार-छायाचित्रकार-मशीन ऑपरेटर यांचा गौरव, तसेच गरजू कुटुंबांना मदतीचा हात यातून त्यांच्या प्रत्यय संवेदनशीलतेचा येतो. शिवाय या क्षेत्रातील प्रत्येक घटकाला ३ लाख रुपयांची अपघात विमा पॉलिसी देण्याचा उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहे.कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत मदतीचा हात पुढे केला. मास्क व सॅनिटायझर वाटप, रुग्णांना बेड व ऑक्सिजनची व्यवस्था, तसेच मुख्यमंत्री मदत :जनिधीसाठी योगदान या सर्व माध्यमातून त्यांनी मानवतेची खरी सेवा केली.
.
संकटात धावून जाणे, गुणी व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणेहीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा मिळत राहो, प्रेरणेचे नवे किरण पसरत राहोतहीच अपेक्षा.
अशा या जिद्दी, कर्तृत्ववान आणि समाजभान जपणाऱ्या संपादक रूपेश पाडमुख यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या कार्याची भरारी अशीच उंचावत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
– रमेश पांडे जेष्ठ पत्रकार, नांदेड

