सद्या राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर खंडाळी जिल्हापरिषद मतदारसंघाचा आढावा घेतला असता जे वास्तव समोर आले,लोकांशी संवाद साधल्यानंतर जे जाणवले ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे केला पाहिजे.असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.!!
खंडाळी ता.अहमदपूर जी.लातूर हे गाव महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून
सतत चर्चेत राहणारे गाव.या वेळीही जिल्हा परिषद
निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे.त्याला कारणीभूत ठरली आहे ती गावातीलच
रहिवासी असलेलेली सौ.शितल प्रदीप खोमणे यांची
खंडाळी जी.प.गटातुन त्यांना मिळालेली राष्ट्रवादी
कांग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडुन महाविकास
आघाडीची उमेदवारी..!!
सौ.शितलताई खोमणे या स्वतः उच्च विद्या विभुषीत
असुन त्यांनी गावातील विकास कामा सोबतच,शिक्षण क्षेत्रात व महिलांच्या विकास कामात दिलेले योगदान
पाहुन त्याना महाविकास आघाडीतील एक घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने उमेदवार म्हणून या निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले असुन त्या नक्कीच निवडून येतील अशी चर्चा खंडाळी
जि.प.गटातील मतदार करताना दिसत आहेत..!!
मला जसे राजकारण कळायला लागले तेव्हा पासून
मी खंडाळीचे राजकारण जवळून पाहत आलोय.त्या वेळी खंडाळी ग्रुप ग्रामपंचायत होती.नंतरच्या काळात
वंजार वाडीला स्वतंत्र ग्राम पंचायत झाली.त्यावेळी खंडाळीच्या राजकारणावर ग्रामपंचायत असो की
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या दोन्ही
वर ही कै.बालासाहेब नामदेवराव पौळ पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व होते.जवळपास दोन दशके त्यांनी आपले वर्चस्व गावच्या राजकारणात कायम टिकवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले..!!
त्यावेळी ओबीसी आरक्षण नव्हते.तरी पण त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केले व नवी समीकरणे राजकारणात रुजवली.त्यांच्याच सहकार्यामुळे सौ.शीतल ताई खोमणे यांचे सासरे कै. संतुकराव खोमणे हे खंडाळीचे सरपंच झाले होते.!
तर दुसऱ्यांदा वंजारवाडीचे कै.ओमप्रकाश चोले यांना
पण त्यानीच संरपच पदाची संधी दिली.तिसरे नाव
कै.मुर्तुजा पटेल यांचे घ्यावे लागेल.खरे तर गावातील
राजकारणात या चौघांनी मिळून ओबीसी व मुस्लिम
या दोन्ही समुदायातील लोकांना समान संधी दिली.
व अहमदपूर तालुक्याच्या राजकारणात नवा आदर्शच घालून दिला त्यांचे सर्व श्रेय माझ्या मते कै.बालासाहेब पाटील यानाच द्यायला हवे.एवढेच नव्हे तर आज
जात व धर्माचा आधार घेऊन स्वार्थी राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांनी यातून बोध घ्यायला हवा असे वाटते.खंडाळीची ही ओळख अहमदपूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर पुरोगामी विचाराचे गाव म्हणूनच कायम राहिली आहे.हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही..!! खंडाळी हे गाव
या गटातील सर्वात मोठे गाव आहे त्या मुळे ज्या बाजूने हे गाव झुकेल त्याचा विजय निश्चित.हेच समिकरण आज पर्यंत राहीलेले पाहायला मिळते.खरे तर खंडाळी जिल्हा परिषद गटाची जात निहाय रचना पाहता हा गट ओबीसी बहुल असल्याचे दिसून येते.
म्हणून या गटात मराठा समाज ज्या उमेदवाराच्या
पारड्यात आपली मते टाकील तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असते असा आजवरचा या गटाचा इतिहास राहिला आहे असे आजवर झालेल्या निवडणुकी वरून पाहायला मिळते असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.खंडाळी हे गाव कांम्रेड आण्णा भाऊ साठे यांच्या वास्तव्या मुळे इतिहासात अजरामर ठरले आहे.! त्या मुळे डाव्या विचारसरणीचा प्रभाव
ब-या पैकी गावात पाहायला मिळतो.असे माझे एक
कार्यकर्ता म्हणून निरिक्षण आहे.त्या सोबतच या गावाने १९८७ ला झालेल्या नांदेड लोकसभेच्या
निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र व विद्यमान राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहुजन विकास
आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लढवलेल्या निवडणुकीत त्यांना लीड देऊन नांदेड लोकसभा
मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या
पुरोगामीत्वाची ओळख करून देवुन इतिहासात नोंद
केली आहे हे ही एक ऐतिहासिक वास्तव आहे.ते नाकारता येत नाही.!
खरं तर राजकारण असो की समाजकारण नेहमीच कालानुरुप बदलत असते तो बदल अपरिहार्य पणे होतच असतो.खंडाळी ही त्याला अपवाद नाही हे
मान्य करून राज्याचे राजकारण जसे जसे बदलत
गेले तसे तसे डाव्या पक्षाच्या राजकारणाला एकुणच
राज्याच्या राजकारणात ओहटी लागायला सुरुवात झाली.तसे तसे खंडाळी हे गावही डाव्या, पुरोगामी
विचारसरणी कडुन उजव्या विचारसरणीच्या भारतीय जनता पक्षा कडे झुकायला लागले त्याचा परिणाम
म्हणून काही काळ का होईना किमान एक दशकभर तरी खंडाळी गावावर भाजपचा अर्थात उजव्या विचारसरणीचा प्रभाव राहिला हे ही मान्यच करावेच लागेल.!
पण पुन्हा एकदा २०१६-१७ ला झालेल्या जी.प.च्या
निवडणूकी वेळी पुरोगामी विचारसरणीचा उमेदवार
या गटातुन निवडुन आल्याचा इतिहास आहे.!
आजच्या परिस्थितीतीचा विचार करता महाविकास
आघाडीतील एकजूट व महायुतीत झालेली बंडखोरी
ही सौ.शितलताई खोमणे यांच्या विजयासाठी जमेची
बाजु ठरेल.सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात झालेल्या
दुःखद निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एकत्र येणार? या चर्चेमुळे मतदारात निर्माण झालेली सुप्त सहानुभूतीची लाट व त्यांनी सुरुवाती पासूनच
प्रचारात घेतलेली आघाडी त्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित सुकर करेल.अशी चर्चा खंडाळी जिल्हा
परिषदेच्या गटात सर्वत्र ऐकायला मिळत आहे..!!
एकंदरीत परिस्थिती पाहता सौ शितल ताई खोमणे
यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.!
या प्रसंगी इतकेच..!!सुनील खंडाळिकर..
अहमदपूर जी.लातुर..!!
फोन ९०११८०४८२८

