गऊळ प्रकरणी कंधार शहरात १५ सप्टेंबर रोजी मातंग विद्रोह धरणे आंदोलनाचे आयोजन ; मातंग बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

कंधार / प्रतिनिधी


कंधार तालुक्यातील गऊळ येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा प्रकरणी प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पुर्ण न झाल्याने व आरोपींवर गुन्हे दाखल न झाल्याने कंधार तालुका सकल मातंग समाज अस्वस्थ झाला असून आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व प्रशासनाकडून अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा सन्मानपूर्वक त्याच जागेवर बसविण्यात यावा यासाठी दि.१५ सप्टेबंर रोजी सकाळी ११ वाजता साठे नगर ते तहसील कार्यालय कंधार धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

३१ ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्यावर ग्रामपंचायतच्या अभिलेखातील नमुना नंबर ८ अ वरील नियोजित जागेवर ग्रामस्थांच्या वतिने पुतळ्याच्या सरंक्षणाची हमी देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्या समक्ष पुतळ्याच्या जागेचा असलेला वाद मिटवून ग्रामस्थांनी पुतळा बसविला.याबाबतचे शपथपत्र दोन्ही समाजाच्या स्वाक्षरीनिशी नियोजित जागेतील २० फुट जागा सोडून पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळी सर्व वाद संपुष्टात आल्याचे साठे म्हणाले.

परंतु २ सप्टेंबर रोजी नांदेड येथून पोलिस प्रशासन गऊळ येथे येऊन मोठा फौजफाट्या सह हजर झाले. सदरील पुतळा हटविण्याचा प्रयत्न करत असतांना,ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली.परंतु दगडफेकीच्या नावाखाली समस्त मातंग समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेत २० ते २५ मातंग समाजातील महिला व पुरूष जखमी झाले. ग्रामसेवकाला हाती धरून शासकीय कामात अडथळा प्रकरणी सुमारे ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.या प्रकरणी समाजातील काही लोकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठराव घेऊन १७ सप्टेंबरपुर्वी मागण्यांना न्याय नाही मिळाल्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड येथील अण्णाभाऊसाठे पुतळ्यापासुन लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जाब विचारणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला होता.यानंतर प्रशासनाने सहा दिवसांत पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले‌.परंतू प्रत्यक्षात पुतळा बसविण्यात आला नाही.त्यामुळे संतप्त मातंग समाजाने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अशी आहे मागणी…

सदरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, काढलेला पुतळा सन्मानपुर्वक प्रशासनाकडून बसविण्यात यावा, नियमबाह्य झालेला लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, याप्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर लाठीमार केला. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबधितांवर कारवाई करावी. गऊळ येथील निंदणीय घटनेस कारणीभुत असलेला समाज कंटक व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात उनसुचिती जाती-जमाती सरंक्षण कायद्याअंतर्गत व मोक्का खाली गुन्हा नोंदविण्यासाठी विशेष चौकशी करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *