आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने टाईप २ डायबेटिस वर मात : ‘जापी’ मध्ये रिसर्च पेपर ची मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाणारा देश आहे असे समजले जाते.

देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात मधुमेह पसरत चालला आहे. आज पाहिलं तर प्रत्येक घरात एकतरी मधुमेही रुग्ण हा असतोच. शिवाय एकदा का मधुमेह झाला, की तो कधीच बरा होत नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधं किंवा इन्सुलिन घ्यावे लागतात असा समज समाजात पसरलेला आहे. तसंच डायबेटीसमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, नजर कमजोर होणे अशा कॉम्प्लिकेशन्सना चाळीशी पुढीलच नाही तर तीस वर्षांखालील तरुण पिढीही या गंभीर समस्यांचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच बदललेली व चुकीची जीवनशैली आणि आजाराविषयीची असलेली अपुरी माहिती. पण आयुर्वेदिक पंचकर्म पद्धती ही डायबेटीस रुग्णांसाठी आयुर्वेदातील “संजीवनी” ठरली आहे. आयुर्वेदातील पंचकर्म पद्धतीने टाईप 2 डायबेटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. अशी माहिती माधवबागचे मराठवाडा विभागाचे झोनल मेडिकल हेड डॉ. बिपीन गोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी या संशोधनाबद्दल तपशीलवार सांगितले. ते म्हणाले माधवबागच्या उपचाराने अनेक रुग्णांनी हायबेटीसवर मात केली असून उपचारानंतर एक वर्षांनंतरही त्यांच्या शरीरातील रक्तातील साखर नॉर्मल असून ते मेडिसिन मुक्त जीवन जगत आहेत. माधवबागने केलेले हे संशोधन जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध जर्नलमधे प्रकाशित झाले असल्याची माहितीही डॉ. बिपीन गोंड यांनी दिली.

डायबेटीसवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक संशोधन करण्यात आली. अनेक अॅडव्हान्स ट्रिटमेंटही आल्या पण तरीही मधुमेही रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसून येत नव्हती. त्यात आयुर्वेदिक पंचकर्म व डाएटच्या मदतीने डायबेटीस रिव्हर्स होऊ शकतो याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्हच उभ राहतं.

आयुर्वेदिक ट्रिटमेंट सगळ्यांनाच सूट होत नाही, आयुर्वेदिक ट्रिटमेंटने आजार बरा व्हायला खूप उशीर लागतो शिवाय आयुर्वेदिक पंचकर्म चालू आहे तोपर्यंत कदाचित डायबेटीस कंट्रोलमध्ये दिसेलही पण ट्रिटमेंट थांबवल्या नंतर डायबेटीस कंट्रोलमध्ये राहील का? पुन्हा डायबेटीस होणार नाही का? अशा गैरसमजातून निर्माण झालेल्या या प्रश्नांनी आयुर्वेदावर नेहमी शंका दाखवली जाते. याच अनुषंगाने आयुर्वेदाविषयी असलेली शंका आणि डायबेटीस रुग्णांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हणून आयुर्वेदिक पंचकर्म पद्धतीने उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माधवबाग संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ. रोहित माधव साने, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदत्त अमीन, पेशंट एंगेजमेंट हेड डॉ. सुहास डावखर आणि रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हेड डॉ. राहुल मांडोळे यांनी सन 2018 मध्ये एकूण 82 टाईप 2 डायबेटीस च्या रुग्णांवर संशोधन सुरु केलं. आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट हे त्या संशोधनाचं नाव. ते संशोधन असं होतं की, तीन महिने डाएट बॉक्स व डायबेटीस रिव्हर्सल पंचकर्म ट्रिटमेंट घेऊन जे रुग्ण जिटीटी टेस्ट (ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ) पास झाले होते. म्हणजेच 75 ग्रॅम साखर खाऊनसुद्धा ज्यांची शुगर नॉर्मल आली होती म्हणजेच या रुग्णांमध्ये रक्तातील साखर पचवण्याची क्षमता सामान्य, नॉन डायबेटीक लोकांप्रमाणे झाली होती अशा रुग्णांना वर्षभर डायबेटीसची कोणतीही अॅलोपॅथी औषधं न देता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

त्यानंतर पुन्हा एक वर्षाने तीन महिन्यांची एव्हरेज दाखवणारी गोल्ड स्टॅण्डर्ड HbAIC चाचणी करण्यात आली. या चाचणीत एक वर्षानंतर एकूण 82 रुग्णांपैकी 76 रुग्णांची HbA1c चाचणी नॉर्मल आली. एकंदरीत या निरीक्षणाचा निष्कर्ष पाहता 92% रुग्ण हे वर्षभर कोणतेही औषधं न घेऊनसुद्धा त्यांची शुगर ही नॉर्मल आली. म्हणजेच ते रुग्ण नॉन डायबेटीक झालेले आहेत हे यावरून दिसून येते. याचाच अर्थ एकदा डायबेटीस रिव्हर्स झाला की तो पुन्हा होत नाही हे या संशोधनाद्वारे समोर आले. सप्टेंबर 2021 मध्ये माधवबागचा आयुर्वेदा अँड डाएटरी मॉडिफिकेशन फॉर टाईप 2 डायबेटीस मॅनेजमेंट हा रिसर्च पेपर JAPI च्या संशोधन प्रबंधामध्ये प्रकाशित झाला.

टाईप 2 डायबेटिस रिव्हर्स करण्याची त्याला परतवून लावण्याची ताकत आयुर्वेदामध्ये आहे हे या संशोधनातून सिद्ध झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं! यावेळी नांदेड मधील दोन्ही माधवबाग क्लीनिक चे हेड डॉ अनिता माली, डॉ प्रकाश जोंधळे (माधवबाग वजिराबाद क्लिनिक) डॉ रचना देशमुख, डॉ विशाल देशमुख (माधवबाग भाग्य नगर क्लिनिक), माधवबागचे डेप्युटी मेडिकल हेड डॉ प्रशांत याकुंडी, रिजनल हेड अनंत नेरळकर, ची मान्यता उपस्थित होते. माधवबागच्या संपूर्ण टीमकडून डायबेटीस रुग्णांना आव्हानही करण्यात आले की, टाईप 2 डायबेटीस हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो फक्त गरज आहे ती योग्य उपचारांची.. संपूर्ण महाराष्ट्रात माधवबागची 274 हून अधिक क्लिनिक्स रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *