कंधार प्रतिनिधी,
प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दि. २८ फेब्रुवारी रोजी तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला आहे.कार्तिकेयन एस. यांची काम करण्याची पध्दत ही वेगळी व आक्रमक तडकीफड काम करण्याची असल्याचे कंधार तालुक्यातील भ्रष्ट कारभाराला आळा बसला पाहीजे या उद्देशाने माजी सैनिक संघटनेच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन तालुक्यातील भ्रष्ट कारभाराचा व समस्यांचा पाढाच वाचला .
कंधार तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात सावळा गोंधळ चालु आहे.पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण भागाचे महत्वाचे ठिकाण आहे .परंतु या कार्यालयात मनमानी व भ्रष्ट कारभार मोठ्या प्रमाणात चालत असतो.
ग्रामसेवक तर ग्राम पंचायतीमध्ये जातच नसल्याने गावातील नागरीकांनाच शहरात येऊन ग्रामसेवक कुठे आहे म्हणून शोधावे लागते.प्राथमिक आरोग्य केंद्रात ही हाच प्रकार चालु आसुन डाॕक्टर मुख्यालयी राहणे तर सोडाच परंतु आठ आठ दिवस अरोग्य केंद्रात येत नाहीत.
यातील अनेक डाॕक्टर शासकीय वेतन घेऊन खाजगी दवाखाने चालवत असतात.कृषी कार्यालययातील आनेक कर्मचारी हे वर कमईत मग्न झाले आहेत.ते शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचे मार्गदर्शन करत नसुन केवळ योजना कागदपत्री राबवल्याचे दाखवत आहेत.राशेन दुकान मालक ही सामान्य लाभार्थ्याची अर्थिक लुट करण्यात मग्न झाले आहेत.
शासनाच्या नियमाने प्रत्येक दुकानवर भाव व माहिती फलक लावणे गरजेचे आहे परंतु हे राशेन माफीया फलक लावत नसुन पावती न देता जास्तीचे पैसे घेत आहेत.तसेच शहरात नगर पालीकेचा स्वच्छतेचा मोठा घोटाळा आसुन यात राजकीय पुढारी व अधीकारी यांचे साटेलोटे असल्याने मनमानी चालु आहे.
शहरातील नागरीकांना विना फिल्टर व तुरटी,बाल्चिंग पावडर न टाकताच अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.अशा अनेक समस्यांचे निवेदन माजी सैनिक संघटनेच्या वतिने तहसीलदार
कार्तिकेयन एस. यांना दिले असल्याने तहसीलदार ही थक्क झाले असुन येणाऱ्या काळात या बाबीकडे लक्ष घालण्याचे अश्वासन कार्तिकेयन एस. यांनी दिले असल्याची माहीती माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी दिली आहे.
यावेळी -जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड तालुका उपाध्यक्ष शेख आजीज तालुका सचीव पोचीराम वाघमारे तालुका कार्य अध्यक्ष गोविंद सुर्यवंशी तालुका संघटक बापुराव कल्याणकर तालुका मिडीया प्रमुख उमाजी पंदलवाड बहादरपुरा सर्कल प्रमुख संभाजी कल्याणकर ई.माजी सैनिक उपस्थित होते.
प्रत्येक गावात जावुन नागरीकांशी संवाद साधणार-बालाजी चुकलवाड
गेल्या 65वर्षापासुन कंधारतालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही.आज पर्यंत प्रत्येक आमदार ,खासदार कोट्यावधी निधी आणाल्याचा गाजावाजा करत आहेत.निधी आणला तर गेला कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यात आरोग्य केंद्र असुन नसल्या सारखे झाले आहे.पाणी ,लाईट ची समस्या भेडसावत आहे.जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेले रस्ते सहा महीन्यातच नाहीसे झाले आहेत.अशा अनेक समस्या लक्षात घेऊन येणाऱ्या काही दिवसात तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आज पर्यंत आमदार खासदार,जिल्हा परिषद सदस्यांनी काय दिवे लावले यांचे पितळ उघडे करुन नागारीकांशी संवाद साधणार आहे.या संवादा नंतर महाराष्ट्रातील माजी सैनिक पदधिकाऱ्यांच्या उपस्थित कंधार भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी व तालुक्याचा विकास करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.