शेती क्षेत्राला चालना देणारा अर्थसंकल्प -राष्ट्रवादी किसान सभा राज्य प्रमुख शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे

कंधार ;

मागील दोन वर्षाच्या कोव्हीड संकटानंतरच्या पार्श्‍वभूमीवर आज माननीय अजित दादांनी मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक तर आहेच पण विशेष शेती व्यवसायाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी किसान सभेचे राज्य प्रमुख शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केली आहे.

चालू वर्षात केंद्रातील अर्थसंकल्प मांडताना श्रीमती निर्मला सीतारमण (अर्थमंत्री ) यांनी कृषिप्रधान देशात शेती क्षेत्राबाबत बजेटच्या शेवटी भाषणात निमित्तमात्र उल्लेख करून शेतकरी समाजाची निराशा केली होती , पण आजच्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवातच माननीय अजित दादांनी राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थव्यवस्थेत सर्व क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे स्थान आहे हे सांगून संकट काळातही चालू वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती व सेवाक्षेत्र यांच्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था टिकून असल्याचे मत व्यक्त करत भूविकास बँकेच्या कर्जा सारखे जुनाट व लाखो शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे कर्ज संपविले .

शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याची बांधिलकी स्वीकारले. विशेष म्हणजे केंद्राची अडचणीची व अन्यायकारक ठरलेली पिक विमा योजना राज्यात नव्या रूपात शेतकरी हित लक्षात घेऊन आणण्याची भूमिका घेतली , दुसरे म्हणजे शेतकऱ्याच्या हळद , कापूस , सोयाबीन या नगदी पिकांच्या मुल वर्धनासाठी काम करण्याची गरज ओळखून त्यासाठी संशोधन , प्रक्रियेला चालना देण्यासाठी ची तरतूदही केल्याचे सांगितले .

सर्वात महत्त्वाची शेती सिंचनासाठी जलसंपदा विभागालाही तरतुदही बऱ्यापैकी करून पाझर तलावाचे पुनःजिवन करून साठवण तलावात करण्याची महत्त्वाची भूमिका घेतली .

एकंदरीत पहिल्यांदाच अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या बजेट मध्ये बहुतांशी शेती व शेतकऱ्यांचे प्रतिबिंब दिसत आहे . केंद्राकडून शेतीक्षेत्राला नाकारण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी राज्याच्या बजेटमध्ये माननीय अजितदादांनी शेतकरी समाजाला हिंमत व मान सन्मान देण्याचा आशादायी प्रयत्न निश्चितच केला असल्याचे मत शंकर अणा धोंडगे यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *