
कंधार ; दिगांबर वाघमारे
मौ. शेल्लाळी ता. कंधार येथिल शेतकरी भास्कर मारोती केंद्रे यांनी शेततळ्यामध्ये तब्बल १५ लाख रूपयाचे मोत्याचे उत्पादन घेतले अशी माहिती जिल्हा कृषि अधिक्षक रविशंकर चलवदे यांनी दिली .
खर्च वजा जाता त्यांना एका वर्षात ९ लाख रुपये निव्वळ नफा झाला… १०गुंठे क्षेत्रफळात असलेल्या या शेततळ्यातुन एवढा मोठा नफा झाला या नावीन्यपूर्ण उपक्रमाची आज
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी यांनी पाहणी केली.व भास्कर केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला .







