पत्रकाराचा आवाज म्हणजे, फेरोज मणियार
समाजाचा अरसा म्हणजे पत्रकार… समाजात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी लोकांपर्यंत पोहचवणारा म्हणजे पत्रकार… अन्यायाला वाचा फोडणारा पत्रकार… आपल्या लेखणीने आणि आपल्या विचाराने नैराश्याच्या वातावरणाला आशेचे नवे किरण दाखवणारा म्हणजे पत्रकार… जे अंधारात असतील त्यांना प्रकाशात घेऊन जाणारा व प्रकाश दाखवणारा अर्थातच पत्रकार आहे. पण खरंच आज हे सारं काही मनमोकळ्या पद्धतीने पत्रकार करु शकतोय का….? मला तर मुळीच वाटतं नाही. आज अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचे तोंड सहजपणे बंद केलं जात आहे मग ते पत्रकार असो वा एखादा सामाजिक कार्यकर्ता. जे खरं बोलण्याचा प्रयत्न करतील त्यांना एक दिवस शांत बसावंच लागतं नव्हे तर त्यांना शांत केलं जातं. त्यांचं तोंड बंद केलं जातं..लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून पाहिलं गेलेल्या पत्रकारिता वर थोडंस बोलावं वाटलं त्यातच लोहा येथील पत्रकार फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातून सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडणारे फिरोज मणियार यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा गौरव होय.
राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड २०२२ जयपुर चा बहुमान पुरस्कार लोहा फेरोज मणियार यांना जाहीर झाला असुन त्यांचा जन्म ०६/०५/१९९० रोजी लोहा येथे सामान्य कूटुंबात झाला त्यांचे शिक्षण बी.जे., एसटीडी, बीए एम सी जे, सुरू असून एम सी एन,एन टीव्ही इलेक्ट्रॅानिक्स मीडीया तसेच २०१५ जनतेचे मत हे साप्ताहिक चालू केले व ते प्रसिद्ध होत आहे
जनतेचे मत माझे मत साप्ताहिकांचे त्यांनी दैनिकात रूपांतर केले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये दैनिक जनतेचे मत माझे मत लोकप्रिय होत आहे. त्यातूनच त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आपल्या निर्भीड पत्रकारीतेतुन काम चालु केले आहे, करित आहेत तसेच २००९ पासून साप्ताहिक अब्दुल कलाम या वृत्त पत्रात तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.

कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना,अत्यंत गरिबीमधुन,पत्रकारितेच्या सुरुवातीपासून ते आजतागायत होणाऱ्या विरोधाला झुगारून आपण प्राप्त केलेले हे यश केवळ अल्पसंख्याकच नव्हे तर सबंध सामाजिक जीवनातील एक प्रेरणादायी अध्याय होय म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
म्हणून या कार्याची दखल घेऊन वरिल पूरस्कार मिळाला आहे सदरिल पूरस्काराचे वितरण दिनांक ३० सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कमी वयात व अल्पावधीत पुरस्कार मिळवील्या त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे म्हणुन त्यांच्याविषयी लिहिण्याचा खटाटोप व सध्याच्या परिस्थीतीवर लिहिला आहे.
खरंच या कलयुगात परखड पत्रकारिता जिवंत आहे का..? पुन्हा एकदा नकळत हा प्रश्न पडतो सर्वत्र पैशासाठी धडपड दिसुन येते. खरेपणा हरवत चाललाय. सर्वसामान्यांचा उठता आवाज म्हणजे पत्रकारिता. काय खोटं काय खरं, दुधातल्या पाण्याप्रमाणे उघडकीस आणणारा व्यक्ती म्हणजे एक पत्रकार असतो. तो खरंच आज या प्रमाणे काम करतोय का… ?आणि त्यांना असं काम करु देतात का…?हे तर आहेच; परंतु प्रत्येक पत्रकार ठरावीक एका पक्षापुरता किंवा जाती धर्मापुरता तसाच वेगवेगळ्या संघटनेत सामाविष्ट होऊन, फक्त तेवढ्यापुरताच मार्यदित राहुन काम करतो हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. एका पत्रकाराला ठरावीक एक सीमा किंवा स्वतःचा एक पक्ष अशी ओळख नसावी. कारण तो फक्तअन्यायाविरुद्ध लढणारा असावा. बसं एवढं वाटतं मला कारण तुमच्याकडे खूप आशेने पाहतो हा सर्वसामान्य प्राचीन काळापासून म्हटलं जातंय की सत्य हिच खरी ताकद आहे. सत्याच्या पुढे पैसा, पद-प्रतिष्ठा टिकु शकत नाही. पण आज नेमकी परिस्थिती उलट झालेली दिसुन येते आज ताकद हेच सत्य आहे. ज्याच्या हाती सत्ता तोच राजा.पैश्याच्या आणि सत्तेच्या मदतीने खोट्याच खरं करतात असं दिसुन येतंय. नक्कीच आज पत्रकारांचा आवाज दबला जातोय असं मला तरी वाटतं म्हणूनच लोकांना किती तरी वर्ष न्यायासाठी लढावं लागतंय तरी सुद्धा त्यांना योग्य न्याय मिळतं नाही. ताकद आणि पैसा हेच सत्य आहे हे या कलयुगात सिद्ध झालंय. आजचे राजकारणी, मोठे उद्योजक, श्रीमंत या सगळ्यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सत्तेपुढे शहाणपण नाही. पैश्याच्या जोरावर अनेक कर्मकांड यांच्याकडून घडतात आणि अगदी सहजरित्या दाबले ही जातात… एखाद्या पत्रकाराने त्यांचे हे कृत्य उघडकीस आणण्याचा साधा प्रयत्न जरी केला तरी त्याचा आवाज लगेच बंद करण्यात येतो ही दुदैवी गोष्ट आपल्या या देशात होते.


