तापमानाने केला कहर.!  नागरिकांनो वाढत्या तापमानात उष्माघातापासून बचावासाठी आरोग्याची काळजी घ्या_- डॉ.पेठकर लक्ष्मीकांत यांचे आवाहन

 

कंधार | धोंडीबा मुंडे

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सूर्य आग ओकू लागला आहे.कंधार तालुका व परिसरात तापमानाने केला कहर,सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमाल तापमानात वाढ होत आहे.त्यामुळे उष्माघातापासून बचावन्यासाठी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन डॉ.पेठकर लक्ष्मीकांत यांनी केले आहे.

 

उष्माघात टाळण्यासाठी दुपारी १२ ते ३ यावेळेमध्ये घराबाहेर पडू नये.घराबाहेर पडताना डोक्याला पांढरे शुभ्र सुती रुमाल अथवा टोपी चा वापर करावा. कष्टाची कामे सकाळी तसेच ५ च्या नंतर करावीत,
देशात सर्वाधिक तापमानाची नोंद मराठवाड्यातील नांदेड शहरासह जिल्ह्यात नोंदवली गेली आहे.शनिवारी दुपारी १:३० ते ३ च्या नोंदीनुसार कंधार शहरांचे तापमान ४२.८३ डिग्री सेल्सिअस होते.

कंधारकर नागरिक मागील १० ते १२ दिवसांपासून वाढत्या उष्णतेच्या झळांनी होरपळून निघत आहेत.सरासरी ४१ ते ४२ डिग्री सेल्ससीअस तापमानाची नोंद झाली. शनिवारी तर कहर झाला. दुपारी १ ते २:३० वाजता ४२.अंश सेल्सिअस मध्ये तापमानाची नोंद झाली आहे.हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान होते, एवढेच काय देशातील सर्वाधिक तापमान म्हणून मराठवाड्यातील नांदेड शहरासह जिल्ह्यात तापमानाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

वाढत्या उन्हापासून स्वतःला जपावे.काळजी घ्यावी असे आवाहन आई क्लिनिक विकासनगर कंधार येथील डॉ.पेठकर लक्ष्मीकांत यांनी उष्माघात टाळण्यासाठी खालील,माहिती माध्यमांना दिली आहे.

 

*उन्हापासून संरक्षणासाठी या करा उपाययोजना*

*♦️काय करावे*

▪️उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर
करण्यात यावा.
■ तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
■ हलकी, पातळ व सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स,छत्री, हॅट,बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी,
■ जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा.तसेच ओल्या कपडयांनी डोके,मान,चेहरा झाकण्यात यावा.
■ शरीरात पाण्याचे प्रमाण कमी
होत असल्याने ओ.आर.एस.घरी बनविण्यात आलेली लस्सी. तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
■ अशक्तपणा,स्थूळपणा,डोकेदुख,सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ
डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
■ गुरांना छावणीत ठेवण्यात यावे.तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
■ घर थंड ठेवण्यासाठी पडदे,शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
■ पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा.तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
■ कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
■ सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
■ पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
■ गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

♦️ *काय करू नये*

■ लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
■ दुपारी १२ ते ४ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
■ बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी १२ ते ४ या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
■ उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे.(तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात
यावीत.)
■ शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इत्यादींचा वापर टाळावा.
■ उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे,व शिळे अन्न खाऊ नये,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *