ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक : मतदान प्रक्रियेला पर्याय

कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुराळा उडाला. लॉकडाऊनमुळे निपचित पडलेल्या खेड्यापाड्यात आता जल्लोष दिसून आला. यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची होती. कारण, लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद-विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आले. तर अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये निवडणूक लागल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे यंदा मात्र निवडणुका लागल्या. शेवटच्या दिवशी देखील अर्ज माघारी न घेतल्याने सर्व तिन्ही प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तिन्ही प्रभागातून 9 उमेदवार ग्रामस्थांना निवडून द्यायचे होते. ज्यासाठी 22 उमेदवार रिंगणात होते. बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये तब्बल 9 निवडणुका बिनविरोध करून सलग 50 वर्षे बिनविरोध राहण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकात होता. मात्र, अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध अर्धशतक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत उमरगा तालुक्यातील आहेत तर कळंब, परंडा, लोहारा या तालुक्यात प्रत्येकी 5, उस्मानाबाद तालुका 3, तुळजापूर 4, भूम तालुका 7 व वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून त्यात भिकार सांगवी, मुळज, जकेकुर, जकेकुरवाडी, चिंचकोटा, बाबळसुर, कोळसुर गु, एकोंडी, पळसगाव व मातोळा या गावांचा समावेश आहे. लोहारा तालुक्यात 5 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात आरणी, मार्डी, राजेगाव, तावशिगड व धानुरी हे आहेत. भूम तालुक्यातील 7 बिनविरोध ग्रामपंचायत असून त्यात उमाचीवाडी, बेदरवाडी, नान्नजवाडी, सोन्नेवाडी, वरुड, बागलवाडी व गोलेगाव यांचा समावेश आहे. वाकडी, परंडा तालुक्यातील देवगाव, खंडेश्वरवाडी, कपिलापुरी, उंडेगाव व भोंजा या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा, आडसुळवाडी, लासरा व दुधाळवाडी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता, डकवाडी व पोहनेर या 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर तुळजापूर तालुक्यातील बारुळ, वानेगाव, अमृतवाडी व पिंपळा खुर्द ही गावे बिनविरोध झाली आहेत. वाशी तालुक्यातील एकमेव सारोळा ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 40 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 388 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणुकीत 3 लाख 13 हजार 326 स्त्री, 3 लाख 60 हजार 659 पुरुष व 5 इतर असे 6 लाख 73 हजार 990 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

नांदेड जिल्ह्यात 1309 ग्रामपंचायतीसाठी अनेक गावात गटातटामुळे चूरस निर्माण झाली होती. मात्र, काही ठिकाणी प्रशासन आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने 103 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या तर उर्वरित 910 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक काल 15 जानेवारीला मतदान संपन्न झाले. नांदेड जिल्ह्यात एकूण 1309 ग्रामपंचायती पैकी- 103 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

1)भोकर-63-बिनविरोध 12

2)मुदखेड-45-बिनविरोध 5

3)लोहा-84-बिनविरोध 5

4)कंधार-98-बिनविरोध 15

5)मुखेड-108 बिनविरोध 6

6)देगलूर-90 बिनविरोध 5

7)माहूर-34 बिनविरोध 1

8)किनवट-134

9)नायगाव-68-बिनविरोध 3

10)अर्धापुर -43 बिनविरोध-6

11)उमरी-58 -बिनविरोध 9

12)धर्माबाद -45 बिनविरोध 3

13)बिलोली -64 बिनविरोध 4

14)हदगाव -108 बिनविरोध 13

15)नांदेड-85-बिनविरोध 5

16)हिमायतनगर-52 बिनविरोध 2

अंबरनाथ तालुक्यात 27 ग्रामपंचायतींपैकी गोरेगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या. विविध ग्रामपंचायतीतील 68 उमेदवार बिनविरोध अंबरनाथ तालुक्यातील मधील 26 ग्रामपंचायतीतील 173 जागांवर निवडणूका झाल्या. कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीपैकी वरप ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होती. विविध ग्रामपंचायती मधील 44 उमेदवार बिनविरोध तर 20 ग्रामपंचायतीमधील 167 जागांवर निवडणूक झाली.

यवतमाळ जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाली. यात छाननी नंतर 20535 उमेदवार यांचे नामनिर्देशन वैध ठरले तर 388 नाम निर्देशन अवैध ठरले. एकूण 3073 प्रभागमध्ये निवडणूक झाली. 8141 सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. अजूनही किती लोकांनी माघार घेतली आणि किती ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत आहे हा आकडा अद्याप निवडणूक विभागाला मिळाला नाही

जालना जिल्ह्यात एकूण 475 ग्रामपंचायती पैकी, एकूण 42 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही. वर्धा जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. 173 प्रभाग असून 472 सदस्यांकरीता निवडणुक होत आहे. तर 22 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. 1279 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणतीही ग्रामपंचायत बिनविरोध नाही. फक्त एका जागेवर एक नामांकन असलेले सदस्य बिनविरोध निवडून आले आहे.

वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी एकूण 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. त्यापैकी वाशिम तालुक्यात सर्वाधिक 5 ग्रामपंचायत तर मालेगावच्या 2 कारंजा मधील 1 रिसोड 1 मानोरा मधील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहे तर मंगरूळपीर मधून एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 629 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून यापैकी 20 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. तर एकूण 5159 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 877 हे बिनविरोध निवडून आले आहे.

1) मालेगाव तालुक्यातील 99 ग्रामपंचायत पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध तर 96 ग्रामपंचायतसाठी 1,684 उमेदवार रिंगणात होते. 2) बागलाण (सटाणा) 40 ग्रामपंचायत पैकी 9 ग्रामपंचायत बिनविरोध 31 ग्रामपंचायतसाठी 540 उमेदवार रिंगणात होते. 3)देवळा : 11 ग्रामपंचायत पैकी 119 जागांसाठी 61 जागा बिनविरोध, 58 जागांसाठी 128 उमेदवार रिंगणात. 2 कोटींची बोली लागलेल्या उमराने ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 15 जागा बिनविरोध, 2 जागासाठी निवडणूक झाली.
4)नांदगाव – 59 ग्रामपंचायत पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध, 54 ग्रामपंचायती साठी 967 उमेदवार रिंगणात.
5)येवला – 69 ग्रामपंचायत पैकी 8 ग्रामपंचायत बिनविरोध, 61 ग्रामपंचायती साठी उमेदवार रिंगणात
6)कळवण – 29 ग्रामपंचायत पैकी 2 बिनविरोध, 27 ग्रामपंचायती साठी 159 उमेदवार रिंगणात होते.

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 767 ग्रामपंचायत आहेत. त्यापैकी 28 ग्रामपंचायत या पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जामखेड तालुक्यात 10 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यात.
पारनेर – 9
राहता – 6
कर्जत – 2
श्रीरामपूर – 1
संगमनेर 4
अकोले 11
कोपरगाव 0
नेवासा 6 बिनविरोध ग्रामपंचायत.

सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून त्यातील 10 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

अकोला जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध
अकोला जिल्ह्यात एकूण 224 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील परंडा, तेल्हारा तालुक्यातील खेल सटवाजी, चांगलवाडी आणि मुर्तिजापूर तालूक्यातील मोहखेड आणि सोनोरी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन ग्रामपंचायती बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील गांधीनगर तर वैभववाडी तालुक्यातील मांगवली या दोन ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात 70 ग्रामपंचायतीत एकूण 600 सदस्य संख्येसाठी 1550 नामनिर्देशन प्राप्त झाले असून 1094 उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे.

धुळे जिल्ह्यातील 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर 4 जानेवारीला माघारीचा दिवस होता. माघारीनंतर जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून जिल्ह्यातून आता 183 ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या.

धुळे तालुक्यात 5 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या.
धुळे तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीपैकी आमदड, चिंचवार, दापुरा,बोरविहीर,सांजोरी या 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 67 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. शिंदखेडा तालुक्यात 15 ग्रामपंचायती बिनविरोध, तर शिंदखेडा तालुक्यातील 63 ग्रामपंचायती पैकी अलाणे, हिसपुर, झोतवाडे, कुंभारे, धांदरणे, सोनसैलू, निशाणे, दिवी, चौगांव बु, दसवेल, टेमलाय, महाळपुर, कामपुर, हुंबर्डे-वडली या 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 48 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून शिरपूर तालुक्यातील 34 ग्रामपंचायतपैकी घोडसगाव, वाठोडे, असली तांडे, पिंपळे तांडा, भावेर, हिंगोणी पाडा या 6 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. अशा जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 218 पैकी 183 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होती.

नंदुरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यापैकी 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 65 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली.

भिवंडीतील केवळ 3 ग्रामपंतायती बिनविरोध निघाल्या असल्याची माहिती मिळाली होती.
भिवंडीतील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने तब्बल 107 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून तालुक्यातील वळ, निवळी व आलिंगर या तीन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आता 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून या 53 ग्रामपंचायतींमधील 12 ग्रामपंचायतींमधील 19 सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 527 ग्रामपंचायती च्या निवडणुका होऊ घातल्या आहे, त्यापैकी सध्या 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात तर तीन तालुक्याची माहिती मिळाली नाही.

हिंगोली जिल्ह्यात एकुण 495 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. ज्यात 74 ग्राम पंचायत बिनविरोध झाल्या आहेत. 421 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे.

परभणी जिल्ह्यात एकुण 566 ग्राम पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यातील परभणी, सेलू आणि जिंतूर तालुक्यातील 41 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 6 तालुक्यांची आकडेवारी लवकर मिळाली नव्हती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गाव असलेलं अहमदनगरमधील राळेगणसिद्धी आणि आदर्श गाव हिवरेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ही दोन्ही गावं पुन्हा चर्चेत आली आहेत. या दोन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडणार आहेत. कारण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गावांना अपयश आलं आहे.

राळेगण सिद्धी गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीतील 9 पैकी फक्त 2 जागा बिनविरोध होणार आहेत. तर 7 जागेवर निवडणूक होणार आहे. 1975 साली अण्णा हजारे हे राळेगण सिद्धी गावामध्ये आले. त्यानंतर सलग 35 वर्षे गावामध्ये बिनविरोध निवडणूक झाली. गेल्या वेळी गावात पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली तर यावेळी देखील बोनविरोध घोषणा होऊनही निवडणूक होणार आहे. गेल्या 45 वर्षात दुसऱ्यांदा राळेगण मध्ये ग्रामपंचायत निवडणुक झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि 25 लाख निधी घ्या असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वात प्रथम राळेगण सिद्धी गावाने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन बिनविरोध घेण्याचा निर्णय झाला होता मात्र तो अपयशी ठरला.

आदर्शगाव हिवरे बाजार गावामध्ये बिनविरोध निवडणुकीला अपयश आले आहे. पहिल्यांदाच हिवरे बाजारमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. सर्व जागांवर निवडणूक पार पडणार आहे. हिवरे बाजार मध्ये एकूण 7 जागा आहेत त्या 7 जागांवर ही निवडणूक होणार आहे. दरवेळी या गावात बिनविरोध सरपंच निवड होत होती. 1990 पासून 30 वर्षात पहिल्यांदा गावात निवडणूक होत आहे. गेल्यावर्षी आरक्षण असल्याने पोपट पवार उप-सरपंच होते. 1958 साली गावाची स्थापना झाली, त्यानंतर 1985 साली निवडणूक झाली. मात्र पोपट पवार सरपंच झाल्यानंतर 30 वर्षात पहिल्यांदा गावात निवडणूक झाली.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१६.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *