काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बालाजी रामराव पांडागळे यांचा स्तुप उपक्रम.;100 भाविकांना स्वखर्चाने घडवून आणली पंढरपूर यात्रा.

कंधार ; प्रतिनिधी

शिराढोण येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते बालाजी रामराव पांडागळे यांनी शंकराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच योगायोगाने याच सुमारास आलेल्या आषाढी एकादशी निमित्त शंभर भाविकांना पंढरपूर यात्रा मोफत घडवली. या भाविकांना घेऊन ते दिनांक 9 रोजी घेऊन गेले आहेत. यात्रेकरूंना प्रवास, निवास ,भोजनाची व्यवस्था बालाजी पांडागळे यांनी स्वखर्चाने केली आहे.


आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समाजातील गोरगरीब, दुर्लक्षित घटकांना सोबत घेऊन पंढरपूर यात्रा घडवून आणली आहे. त्यांच्या या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
त्यामुळे त्यांची ही पंढरपूरची वारी की जि.प.ची तयारी अशी चर्चा त्यांच्या मित्रपरिवार व समाजातून जोर धरत आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी बालाजी पांडागळे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून दोन वेळा काँग्रेस श्रेष्ठीकडे तिकिटाची मागणी केली होती. परंतु पक्षाने संधी दिली नाही. तरीही वरिष्ठाचा आदेश मानून नाराज न होता त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहो रात्र पक्षाचे काम न थांबता गाव तेथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अशा पद्धतीने पक्षवाढी साठी काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला आता पक्षाने समाजाची सेवा करण्याची संधी द्यावी अशी कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. यासाठी बालाजी पांडागळे यांचे मित्र मंडळ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची लवकरच भेट घेणार असे यांचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *